शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

नारळ उत्पादनात घट झाल्याने समस्या, किंमती गगनाला भिडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 15:13 IST

नारळांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्वी अवघ्या दहा रूपयांत मिळणाऱ्या नारळाची किंमत आता पंचवीस रूपयांवर पोहोचली आहे. विविध रोगांची लागण आणि माकडांकडून बागांचे सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे नारळ उत्पादनात घट झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे नारळ उत्पादनात घट झाल्याने समस्या, किंमती गगनाला भिडल्यासर्वसामान्य नागरिकांना झळ

सिंधुदुर्ग : नारळांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्वी अवघ्या दहा रूपयांत मिळणाऱ्या नारळाची किंमत आता पंचवीस रूपयांवर पोहोचली आहे. विविध रोगांची लागण आणि माकडांकडून बागांचे सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे नारळ उत्पादनात घट झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.नारळ पीक हे कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक आहे. नारळाच्या करवंटी, सोडण, झावळ, खोड यासारख्या सर्वच अवशेषांचा वापर होत असल्याने या वृक्षाला कल्पवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. कोकणी माणसाच्या दैनंदिन आहारात तर नारळाच्या खोबºयाचा समावेश अपरिहार्य असतो. एकंदरीत संपूर्ण कोकणपट्टीतच नारळाला महत्त्वपूर्ण स्थान असले, तरी गेल्या काही दिवसांपासून या नारळाने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.गेल्या काही दिवसांपासून नारळांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात अवघ्या दहा रूपयांना मिळणाऱ्या नारळासाठी आज दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. साधारण मोठ्या नारळांच्या किंमती ३० ते ३५ रूपयांवर पोहचल्या आहेत.

दरम्यान, कोळीवर्गीय तसेच इतर रोगांमुळे नारळ उत्पादनात मोठी घट येत आहे. कोकणीतील बहुतेक सर्वच गावांमध्ये नारळ बागायतींचे माकडांकडून सातत्याने नुकसान होत असल्यानेही नारळ उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होत असून, नारळांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या आहेत.वन, कृषी विभागाच्या सहकार्याची गरजमाकडांचा बंदोबस्त आणि कोळीवर्गीय रोगांवर वेळीच उपाययोजना झाल्यास नारळ उत्पादनाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासंदर्भात ग्रामीण भागात कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, यासाठी वन आणि कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग