शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नारळ उत्पादनात घट झाल्याने समस्या, किंमती गगनाला भिडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 15:13 IST

नारळांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्वी अवघ्या दहा रूपयांत मिळणाऱ्या नारळाची किंमत आता पंचवीस रूपयांवर पोहोचली आहे. विविध रोगांची लागण आणि माकडांकडून बागांचे सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे नारळ उत्पादनात घट झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे नारळ उत्पादनात घट झाल्याने समस्या, किंमती गगनाला भिडल्यासर्वसामान्य नागरिकांना झळ

सिंधुदुर्ग : नारळांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्वी अवघ्या दहा रूपयांत मिळणाऱ्या नारळाची किंमत आता पंचवीस रूपयांवर पोहोचली आहे. विविध रोगांची लागण आणि माकडांकडून बागांचे सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे नारळ उत्पादनात घट झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.नारळ पीक हे कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक आहे. नारळाच्या करवंटी, सोडण, झावळ, खोड यासारख्या सर्वच अवशेषांचा वापर होत असल्याने या वृक्षाला कल्पवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. कोकणी माणसाच्या दैनंदिन आहारात तर नारळाच्या खोबºयाचा समावेश अपरिहार्य असतो. एकंदरीत संपूर्ण कोकणपट्टीतच नारळाला महत्त्वपूर्ण स्थान असले, तरी गेल्या काही दिवसांपासून या नारळाने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.गेल्या काही दिवसांपासून नारळांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात अवघ्या दहा रूपयांना मिळणाऱ्या नारळासाठी आज दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. साधारण मोठ्या नारळांच्या किंमती ३० ते ३५ रूपयांवर पोहचल्या आहेत.

दरम्यान, कोळीवर्गीय तसेच इतर रोगांमुळे नारळ उत्पादनात मोठी घट येत आहे. कोकणीतील बहुतेक सर्वच गावांमध्ये नारळ बागायतींचे माकडांकडून सातत्याने नुकसान होत असल्यानेही नारळ उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होत असून, नारळांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या आहेत.वन, कृषी विभागाच्या सहकार्याची गरजमाकडांचा बंदोबस्त आणि कोळीवर्गीय रोगांवर वेळीच उपाययोजना झाल्यास नारळ उत्पादनाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासंदर्भात ग्रामीण भागात कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, यासाठी वन आणि कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग