शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एकनाथ शिंदे मातोश्रीवर आल्यास आश्चर्य वाटायला नको, विनायक राऊतांचे भाकीत

By अनंत खं.जाधव | Updated: August 14, 2023 16:13 IST

पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत 

सावंतवाडी : राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्यासमवेत सरकारमध्ये समाविष्ट झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार सध्या अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे माफी मागायला मातोश्रीवर आले तर आर्शचय वाटायला नको असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वर्तविले.मात्र याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच असल्याचे मत ही यावेळी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाबुराव धुरी मायकल डिसोझा, बाळू माळकर, बाळा गावडे, आबा सावंत, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.राऊत म्हणाले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात विस्तव सुध्दा जात नाही. दोघांत स्पर्धा वाढली आहे. त्याचे टोकाचे वाद हे सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाच्या आड येत आहेत. पण ते योग्य नाही. पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत मणिपूर सारखे राज्य गेले तीन महिने पेटत आहे. त्याकडे बघायला कोणाला वेळ नाही. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ दोन ते तीन महिने बोलतात याला काय म्हणायचे पंतप्रधान पत्रकारांशी सोडा संसदेत येऊन बोलत नाहीत पण त्यांना काय म्हणायचे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.भविष्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वाटचाल खडतर आहे. त्यांच्या सोबत गेलेल्यांना उमेदवारी मिळणार की नाही यात शंका आहे. त्यातच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणखी अस्वस्थ झाले असून भविष्यात मातोश्रीवर माफी मागण्यास आले तर आर्शचय वाटायला नको असे भाकित त्यांनी व्यक्त केले. हत्ती हटावसाठी आसाम ऐवजी कर्नाटक मधून टीम बोलवाहत्तीचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी आसाम येथील पथक न आणता कर्नाटक मधील पथक आणा मी स्वत: यासाठी पूर्ण सहकार्य करेल. मागच्या वेळचा इतिहास पाहता कर्नाटकमधीलच तज्ञ लोक हत्तीचा बंदोबस्त करतील असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे