शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:04 IST

१७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना दिल्याचे समजते.

ठळक मुद्देबॅक डेटने कामांना मंजुरी देऊ नका : के. मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

सिंधुदुर्गनगरी : १७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने  मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना दिल्याचे समजते.केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुलक्ष्मी यांनी शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असताना कार्यालयात हजर राहून आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या दोन्ही दिवशी जिल्हा परिषदेतील कार्यलये सुरु होती. रविवारी संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयुक्तांनी १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्याने संपूर्ण देशात आचार संहिता लागू झाली आहे.परिणामी आता कोणत्याही नवीन कामांना मंजुरी देणे, ई-निविदा प्रसिद्ध करणे, कार्यारंभ आदेश देणे ही प्रशासकीय पातळीवरील कामे थांबणार आहेत. तसे केल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका येऊ शकतो. त्यामुळे सोमवारी मंजूलक्ष्मी यांनी कोणत्याही कामांची बॅक डेटने पूर्तता करावयाची नाही, असे आदेशच आपल्या प्रशासनाला बजावले आहेत.मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चीत राहणारदरम्यान, १० मार्च रोजी सुरु झालेली आचारसंहिता २७ मे पर्यंत सुरु राहणार आहे. २३ एप्रिल रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निवडणूक होत असली तरी निवडणूक आयुक्तांनी २७ मे पर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेचा खर्च १०० टक्के होणार नाही. जिल्हा नियोजनने जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांची यादी नुकतीच दिली आहे. त्याचेही सोपस्कार पूर्ण करावयाचे राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेचा स्वनिधी खर्च फेब्रुवारी अखेरपर्यंत ४० टक्केच झाला होता. त्यामुळे हा निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची शक्यता आहे.ग्रामीण विकासाला खीळ बसणार२७ मे पर्यंत आचार संहिता राहणार आहे. तर याच दरम्यान जिल्ह्यात पाऊस सुरु होतो. त्यामुळे रस्ते, शाळा दुरुस्ती, नवीन इमारती हि कामे निश्चितच रखडणार आहेत. लोकसभेची आचारसंहिता असल्याने निधी खर्चाचे नियोजन वेळेत करा, अशी मागणी पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य वारंवार करीत होते. तरीही निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला खीळ बसणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग