शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

स्वच्छतेत जिल्ह्याचे काम चांगले : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:37 IST

zp sindhudurg- स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्दे स्वच्छतेत जिल्ह्याचे काम चांगले : कलशेट्टी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या डॉ. कलशेट्टी यांचा जिल्हा परिषदेकडून सत्कार

ओरोस : स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक शासनाच्या प्रत्येक योजनेत चांगले काम करतात. स्वच्छतेत या जिल्ह्याने चांगले काम केल्याने आपण या जिल्ह्याच्या प्रेमात पडलो. हागणदारीमुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढे मोठे काम केले की राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारण्यासाठी जाण्याकरिता रेल्वेचा डबा आम्हांला आरक्षित करावा लागला होता. कर वसुलीत तर या जिल्ह्याचा हात कोणीच धरू शकत नाही.डॉ. कलशेट्टी हे जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हा परिषदेने त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. कलशेट्टी म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना आमची जिल्हास्तरीय समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मूल्यमापनसाठी आली होती. त्यावेळी आंबडोस गाव प्रथम आला होता. त्यावेळी मी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा फिरलो होतो. त्यानंतर शासनाने माझी हागणदारीमुक्त अभियानच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम जवळून पाहिले आहे.यानंतर शासनाने पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजना आणली. यातही सिंधुदुर्ग पुढे होता. कर वसुली, शौचालय उभारणी ही कामे मोठ्या स्वरुपात केल्याने जिल्ह्याला हे यश मिळाले. यामुळे हा जिल्हा माझे नेहमीच आकर्षण राहिले आहे. वेंगुर्ला नगर परिषदेने सांडपाणी व्यवस्थापन व कचरा निर्मूलन यामध्ये केलेले काम राज्यातील मोठ्या नगरपालिकांनी करावे, असे आपल्याला वाटते.

राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक व भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात यासाठी वेगळे नियोजन अपेक्षित आहे. स्वच्छतेत जिल्ह्यातील नागरिक जागरुक आहेत. ९० टक्के नागरिक पाणी नमुने तपासणी करून घेतात. आता सिंधुदुर्ग जिल्हा जलजीवन मिशनचे काम चांगले करेल अशी अपेक्षा आहे, असे शेवटी डॉ. कलशेट्टी म्हणाले. 

टॅग्स :commissionerआयुक्तsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद