शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत जिल्ह्याचे काम चांगले : कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:37 IST

zp sindhudurg- स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्दे स्वच्छतेत जिल्ह्याचे काम चांगले : कलशेट्टी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या डॉ. कलशेट्टी यांचा जिल्हा परिषदेकडून सत्कार

ओरोस : स्वच्छ पाण्याबाबत जिल्ह्यातील नागरिक जागरूक आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे भूजल सर्वेक्षण संचालक तथा महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय ठरलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ निर्माण करणारे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी येथील जिल्हा परिषदेत व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक शासनाच्या प्रत्येक योजनेत चांगले काम करतात. स्वच्छतेत या जिल्ह्याने चांगले काम केल्याने आपण या जिल्ह्याच्या प्रेमात पडलो. हागणदारीमुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढे मोठे काम केले की राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारण्यासाठी जाण्याकरिता रेल्वेचा डबा आम्हांला आरक्षित करावा लागला होता. कर वसुलीत तर या जिल्ह्याचा हात कोणीच धरू शकत नाही.डॉ. कलशेट्टी हे जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हा परिषदेने त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. कलशेट्टी म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना आमची जिल्हास्तरीय समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मूल्यमापनसाठी आली होती. त्यावेळी आंबडोस गाव प्रथम आला होता. त्यावेळी मी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा फिरलो होतो. त्यानंतर शासनाने माझी हागणदारीमुक्त अभियानच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम जवळून पाहिले आहे.यानंतर शासनाने पर्यावरण संतुलित ग्राम समृद्ध योजना आणली. यातही सिंधुदुर्ग पुढे होता. कर वसुली, शौचालय उभारणी ही कामे मोठ्या स्वरुपात केल्याने जिल्ह्याला हे यश मिळाले. यामुळे हा जिल्हा माझे नेहमीच आकर्षण राहिले आहे. वेंगुर्ला नगर परिषदेने सांडपाणी व्यवस्थापन व कचरा निर्मूलन यामध्ये केलेले काम राज्यातील मोठ्या नगरपालिकांनी करावे, असे आपल्याला वाटते.

राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक व भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात यासाठी वेगळे नियोजन अपेक्षित आहे. स्वच्छतेत जिल्ह्यातील नागरिक जागरुक आहेत. ९० टक्के नागरिक पाणी नमुने तपासणी करून घेतात. आता सिंधुदुर्ग जिल्हा जलजीवन मिशनचे काम चांगले करेल अशी अपेक्षा आहे, असे शेवटी डॉ. कलशेट्टी म्हणाले. 

टॅग्स :commissionerआयुक्तsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद