शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन

By अनंत खं.जाधव | Updated: October 5, 2024 16:46 IST

'..नाहीतर कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी पर्यत जाईल'

सावंतवाडी : महाराष्ट्रात निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. पण योजना पूर्ण करायला यांच्याकडे पैसे नसल्यानेच आता रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळेच निवडणूका लवकर लागल्या पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल आणि ते आपणास परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज, शनिवारी शरदचंद्र गटाची जाहीर सभा सावंतवाडीतील गांधी चौकात पार पडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, सायली दुभाषी,  देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंतच्या इतिहासात सध्या सुरू असलेला भष्ट्राचार जनतेने कधीच पाहिला नव्हता. हे इव्हेंटचे सरकार झाले आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाही आणि लाडकी बहीण योजना आणली. बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार पण सांगणार कोण? फक्त राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे. आता नव्या योजनासाठी सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. कर्ज घ्याचे तरी बंद करतील नाहीतर राज्यावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल अशी भिती पाटील यांनी व्यक्त केली.'पंधरा वर्षापूर्वीच्या घोषणा आजही पूर्ण झाल्या नाहीत'पाटील यांनी यावेळी केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली. दिवाळी आली तरी गणवेश नाही. यांना आता फक्त लाडका काॅन्ट्रकटर हवा आहे. पण मुलांचे गणवेश नको. मतदारसंघात पंधरा वर्षापूर्वी ज्या घोषणा केल्या त्या आज ही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच नवो आमदार हवो असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडवली.गव्हाणे यांनी तर आपल्या तडाखेबाज भाषणातून सरकार वर जोरदार हल्ला चढवला आणि राज्यात बदल घडवलाच तरच हा महाराष्ट्र स्वाभिमानाने जगेल अन्यथा हे गद्दार आपला स्वाभिमान महाराष्ट्रा समोर गहाण ठेवतील अशी भिती व्यक्त केली. तर अर्चना घारे-परब यांनी जाणीव जागर यात्रेतून मला जनतेच्या समस्या कळल्या. आता या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुमचा आशिर्वाद हवा असे आवाहन केले. माजी मंत्री भोसले यांनी केसरकर यांनी फक्त घोषणा केली पुढे काय झाले ते त्यांनाच माहिती अशा शब्दात टिका केली. अमित सामंत, सुरेश दळवी यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सुरेश दळवीच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती