शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन

By अनंत खं.जाधव | Updated: October 5, 2024 16:46 IST

'..नाहीतर कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी पर्यत जाईल'

सावंतवाडी : महाराष्ट्रात निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. पण योजना पूर्ण करायला यांच्याकडे पैसे नसल्यानेच आता रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळेच निवडणूका लवकर लागल्या पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल आणि ते आपणास परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार घालवा आणि सर्वसामान्यांचे सरकार आणा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज, शनिवारी शरदचंद्र गटाची जाहीर सभा सावंतवाडीतील गांधी चौकात पार पडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, सायली दुभाषी,  देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार जयंत पाटील म्हणाले, आतापर्यंतच्या इतिहासात सध्या सुरू असलेला भष्ट्राचार जनतेने कधीच पाहिला नव्हता. हे इव्हेंटचे सरकार झाले आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाही आणि लाडकी बहीण योजना आणली. बहीण सुरक्षित राहिली तरच योजना चालणार पण सांगणार कोण? फक्त राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे. आता नव्या योजनासाठी सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे. त्यामुळे निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत. कर्ज घ्याचे तरी बंद करतील नाहीतर राज्यावर नऊ लाख कोटीचे कर्ज होईल अशी भिती पाटील यांनी व्यक्त केली.'पंधरा वर्षापूर्वीच्या घोषणा आजही पूर्ण झाल्या नाहीत'पाटील यांनी यावेळी केसरकर यांच्यावर जोरदार टिका केली. दिवाळी आली तरी गणवेश नाही. यांना आता फक्त लाडका काॅन्ट्रकटर हवा आहे. पण मुलांचे गणवेश नको. मतदारसंघात पंधरा वर्षापूर्वी ज्या घोषणा केल्या त्या आज ही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच नवो आमदार हवो असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडवली.गव्हाणे यांनी तर आपल्या तडाखेबाज भाषणातून सरकार वर जोरदार हल्ला चढवला आणि राज्यात बदल घडवलाच तरच हा महाराष्ट्र स्वाभिमानाने जगेल अन्यथा हे गद्दार आपला स्वाभिमान महाराष्ट्रा समोर गहाण ठेवतील अशी भिती व्यक्त केली. तर अर्चना घारे-परब यांनी जाणीव जागर यात्रेतून मला जनतेच्या समस्या कळल्या. आता या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुमचा आशिर्वाद हवा असे आवाहन केले. माजी मंत्री भोसले यांनी केसरकर यांनी फक्त घोषणा केली पुढे काय झाले ते त्यांनाच माहिती अशा शब्दात टिका केली. अमित सामंत, सुरेश दळवी यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सुरेश दळवीच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती