शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

बुरूड व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 23:54 IST

प्लास्टिकचा वापर वाढला : समाजातील युवकांचेही दुर्लक्ष; शासनाच्या मदतीची गरज

वैभव साळकर -- दोडामार्ग --प्लास्टिकचा वाढता वापर, बाजारपेठेत मिळणारा अल्प मोबदला आणि युवा पिढीचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे परंपरागत चालत आलेला हस्तकला बुरूडकाम व्यवसाय संकटात सापडला आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात बाजारपेठेत रेडीमेड चटई, टोपल्या व अन्य प्लास्टिक सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे बांबपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे परंपरागत चालत आलेल्या या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. बांबूच्या वाढत्या दरामुळे काही कारागिरांनी बरूड व्यवसाय बंंद केल्याचे सांगितले. सुमारे २४ फूट लांब व १२ फूट रूंद आकाराच्या दाळी, टोपली, इत्यादी साहित्य बनवायचे असेल, तर किमान १५ दिवस मेहनत करावी लागते. याकामी काही वेळा मजुरीवर माणसे घेऊन काम केले जाते. दाळ्या, टोपल्या, सुप, झाडू व अन्य घरगुती वापरातील वस्तू एक-दोन दिवसांत बनू शकतात. लग्न कार्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूच्या वस्तंूची मागणी असते. तयार केलेला माल गावात किंवा स्थानिक बाजारपेठेत नेला जातो. परंतु पुरेसा मोबदला मिळत नसल्याने बहुतांश बुरूड कारागीर नजीकच्या म्हापसा- गोवा येथील बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेतात. परंतु तेथेही पारंपरिक संस्कृतीवर आधुनिकतेचा प्रहार पडल्याने तेजी-मंदीचा सामना या कारागिरांना कारावा लागत आहे. विज्ञान व प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील हस्तकला उद्योग ऱ्हास पावत चालले आहेत. नवनवे शोध, उपकरणे व इतर साहित्य स्पर्धात्मक बाजारपेठेत येत आहे. त्यामुळे बुरूडकाम व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. तरीदेखील काही कारगिरांच्या जिद्दी स्वभावामुळे स्पर्धात्मक बाजारपेठेत हा व्यवसाय कसाबसा टिकून आहे. परंतु, प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही अंशी तरुण पिढीनेही या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, दोन हातांना काम मिळवून देणाऱ्या या बुरूडकाम व्यवसायाकडे तरुणांनी दुर्लक्ष न करता आकर्षित होणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत आपण तयार केलेल्या वस्तूंचा टिकाव लागावा, या व्यवसायास ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बुरूडकाम प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण काही संस्थांमार्फत जिल्ह्यात दिले जात आहे. त्याला चालना देण्यासाठी शासनाच्या मदतीचीही खरी गरज आहे. लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही प्राप्त झाल्यास बेरोजगार तरूणांना बुरूडकाम व्यवसाय रोजगार मिळवून देणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.