शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

बुरूड व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 23:54 IST

प्लास्टिकचा वापर वाढला : समाजातील युवकांचेही दुर्लक्ष; शासनाच्या मदतीची गरज

वैभव साळकर -- दोडामार्ग --प्लास्टिकचा वाढता वापर, बाजारपेठेत मिळणारा अल्प मोबदला आणि युवा पिढीचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे परंपरागत चालत आलेला हस्तकला बुरूडकाम व्यवसाय संकटात सापडला आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात बाजारपेठेत रेडीमेड चटई, टोपल्या व अन्य प्लास्टिक सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे बांबपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यामुळे परंपरागत चालत आलेल्या या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. बांबूच्या वाढत्या दरामुळे काही कारागिरांनी बरूड व्यवसाय बंंद केल्याचे सांगितले. सुमारे २४ फूट लांब व १२ फूट रूंद आकाराच्या दाळी, टोपली, इत्यादी साहित्य बनवायचे असेल, तर किमान १५ दिवस मेहनत करावी लागते. याकामी काही वेळा मजुरीवर माणसे घेऊन काम केले जाते. दाळ्या, टोपल्या, सुप, झाडू व अन्य घरगुती वापरातील वस्तू एक-दोन दिवसांत बनू शकतात. लग्न कार्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूच्या वस्तंूची मागणी असते. तयार केलेला माल गावात किंवा स्थानिक बाजारपेठेत नेला जातो. परंतु पुरेसा मोबदला मिळत नसल्याने बहुतांश बुरूड कारागीर नजीकच्या म्हापसा- गोवा येथील बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेतात. परंतु तेथेही पारंपरिक संस्कृतीवर आधुनिकतेचा प्रहार पडल्याने तेजी-मंदीचा सामना या कारागिरांना कारावा लागत आहे. विज्ञान व प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील हस्तकला उद्योग ऱ्हास पावत चालले आहेत. नवनवे शोध, उपकरणे व इतर साहित्य स्पर्धात्मक बाजारपेठेत येत आहे. त्यामुळे बुरूडकाम व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. तरीदेखील काही कारगिरांच्या जिद्दी स्वभावामुळे स्पर्धात्मक बाजारपेठेत हा व्यवसाय कसाबसा टिकून आहे. परंतु, प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही अंशी तरुण पिढीनेही या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, दोन हातांना काम मिळवून देणाऱ्या या बुरूडकाम व्यवसायाकडे तरुणांनी दुर्लक्ष न करता आकर्षित होणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत आपण तयार केलेल्या वस्तूंचा टिकाव लागावा, या व्यवसायास ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी बुरूडकाम प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. असे प्रशिक्षण काही संस्थांमार्फत जिल्ह्यात दिले जात आहे. त्याला चालना देण्यासाठी शासनाच्या मदतीचीही खरी गरज आहे. लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही प्राप्त झाल्यास बेरोजगार तरूणांना बुरूडकाम व्यवसाय रोजगार मिळवून देणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.