शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चर्चासत्रांमधून विचारमंथन घडाव

By admin | Updated: January 15, 2015 23:29 IST

दीपक केसरकर : बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभे

बांदा : भारत हा शेतीप्रधान देश असून ग्रामीण भागातील शेतीची उत्पादने सुधारीत शेती पद्धतीनुसार वाढविण्यावर भर देण्यात येणार असून यासाठी कोकणात जैविक शेती उत्पादकता प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशाला दिशा देण्याचे काम हे विचारवंत करतात, यासाठी या चर्चासत्राच्या माध्यमातून विचारमंथन घडावे, असे प्रतिपादन वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पानवळ येथे केले.येथील गोगटे- वाळके महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या ३२ व्या वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय संबंध- स्वरुप आणि आव्हाने’ या विषयावर तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेसिडेंट उमेश फातरफोड यांनी भुषविले. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर, औरंगाबादचे संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक नाईकवाडे, प्रा. पी. डी. देवरे, डॉ. एस. पी. वेल्हाळ, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत आदि मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.डॉ. अशोक नाईकवाडे म्हणाले की, ज्ञानदानाच्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. भारताने व्यापारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण स्वीकारले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाने किती संबंध प्रस्थापित केलेत याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जागतिक राजकारणात आपल्या देशाची भूमिका काय राहणार याची सविस्तर चर्चा चर्चासत्रात होणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. सावंत यांनी या चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला.संस्थेचे अध्यक्ष उमेश फातरफोड म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचा विस्तार हा मोठा असून विद्यापीठाच्या नियमावलीत ग्रामीण भागातील महाविद्यालयांना सवलत द्यावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाची उभारणी व बांदावासीयांचे योगदान याबाबत माहिती दिली. हे केवळ चर्चासत्र नसून ज्ञानसत्र व विचारसत्र असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी या चर्चासत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विचारवंत, संशोधक उपस्थित होते. पहिल्या दिवशी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. डी. कार्वेकर यांनी केले. आभार प्रा. के. के. म्हेत्री यांनी मानले. (प्रतिनिधी)तंत्रज्ञानाचा फायदा घ्या : राजन वेळुकरसोशल मीडियाचा वापर हा अत्यावश्यक असून याचा अभ्यास करणे हा गरजेचा आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे आकलन होते. यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांनी केले.