शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

देवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:25 AM

देवगड तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देदेवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवानाअचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर परिपक्व

देवगड : तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.

सध्या चारशे ते बाराशे रुपये प्रति डझनाने आंबा स्थानिक बाजारेपठामध्ये विकला जात आहे. तर वाशी मार्केटमधील पाच डझनी पेटीच्या आंब्याला तीन ते साडेतीन हजार रुपये भाव असल्याचे सांगण्यात येत आहे.यावर्षी देवगड हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत विक्रमी असा बहारदार मोहोर देवगड हापूस आंबा कलमांना आला होता. मात्र थ्रीप्स रोगाने थैमान घातल्याने बहुतांशी कमी प्रमाणात आंबा पिक झाले आहे.

सध्या देवगड तालुक्यामधून सुमारे पाच हजार हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटला नेहमी रवाना होत आहेत. या हापूस आंब्याच्या पाच डझन पेटीला सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे.याच दर्जाचा आंबा स्थानिक बाजारपेठांमध्ये आठशे ते हजार रुपये डझनने विकला जात आहे. यावरुन वाशी मार्केटमधील आंबा पेटीचा भाव व स्थानिक बाजारपेठामधील आंबा पेटीचा भाव यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत जाणवत आहे. यामध्ये स्पष्ट दिसून येते की, वाशी मार्केटमधील दलालांची मक्तेदारी व बागायतदारांची होत असलेली पिळवणूक वाढत चालली आहे.यावर्षी मार्च महिन्याच्या २२ तारीखेपर्यंत थंडी टिकून राहिल्याने बहुतांश आंबा या थंडी व थ्रिप्सचा प्रार्दुभाव वाढल्याने आंबा गळून पडला होता. मात्र २३ मार्च पासून थंडी गायब होऊन उष्णता वाढल्याने खऱ्या अर्थाने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

उष्णतेमुळे थ्रीप्स रोग संपुष्टाता आला असून आंबाही तयार होण्यास पोषक वातारण निर्माण झाले आहे. देवगड तालुक्यातील बागायतदारांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणीही भाडे तत्वावरती स्टॉल घेऊन देवगड हापूसची आंबा विक्री सुरु केली आहे. त्याही ठिकाणी चांगला भाव बागायतदारांना मिळत आहे.थ्रीप्स रोगाने शेवटच्या टप्प्यातील मोहोराचे नुकसानडिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहोराला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. त्याच मोहोराचे फळ टिकले आहे. मात्र अखेरच्या टप्यातील फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या मोहोरावरती चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. मात्र थ्रीप्स या रोगाने शेवटच्या टप्यातील आलेल्या मोहोराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेवटच्या टप्यातील म्हणजेच मे महिन्यातील हापूस आंबा कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग