शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

देवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 11:28 IST

देवगड तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देदेवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवानाअचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर परिपक्व

देवगड : तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.

सध्या चारशे ते बाराशे रुपये प्रति डझनाने आंबा स्थानिक बाजारेपठामध्ये विकला जात आहे. तर वाशी मार्केटमधील पाच डझनी पेटीच्या आंब्याला तीन ते साडेतीन हजार रुपये भाव असल्याचे सांगण्यात येत आहे.यावर्षी देवगड हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत विक्रमी असा बहारदार मोहोर देवगड हापूस आंबा कलमांना आला होता. मात्र थ्रीप्स रोगाने थैमान घातल्याने बहुतांशी कमी प्रमाणात आंबा पिक झाले आहे.

सध्या देवगड तालुक्यामधून सुमारे पाच हजार हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटला नेहमी रवाना होत आहेत. या हापूस आंब्याच्या पाच डझन पेटीला सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे.याच दर्जाचा आंबा स्थानिक बाजारपेठांमध्ये आठशे ते हजार रुपये डझनने विकला जात आहे. यावरुन वाशी मार्केटमधील आंबा पेटीचा भाव व स्थानिक बाजारपेठामधील आंबा पेटीचा भाव यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत जाणवत आहे. यामध्ये स्पष्ट दिसून येते की, वाशी मार्केटमधील दलालांची मक्तेदारी व बागायतदारांची होत असलेली पिळवणूक वाढत चालली आहे.यावर्षी मार्च महिन्याच्या २२ तारीखेपर्यंत थंडी टिकून राहिल्याने बहुतांश आंबा या थंडी व थ्रिप्सचा प्रार्दुभाव वाढल्याने आंबा गळून पडला होता. मात्र २३ मार्च पासून थंडी गायब होऊन उष्णता वाढल्याने खऱ्या अर्थाने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

उष्णतेमुळे थ्रीप्स रोग संपुष्टाता आला असून आंबाही तयार होण्यास पोषक वातारण निर्माण झाले आहे. देवगड तालुक्यातील बागायतदारांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणीही भाडे तत्वावरती स्टॉल घेऊन देवगड हापूसची आंबा विक्री सुरु केली आहे. त्याही ठिकाणी चांगला भाव बागायतदारांना मिळत आहे.थ्रीप्स रोगाने शेवटच्या टप्प्यातील मोहोराचे नुकसानडिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहोराला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. त्याच मोहोराचे फळ टिकले आहे. मात्र अखेरच्या टप्यातील फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या मोहोरावरती चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. मात्र थ्रीप्स या रोगाने शेवटच्या टप्यातील आलेल्या मोहोराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेवटच्या टप्यातील म्हणजेच मे महिन्यातील हापूस आंबा कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग