शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

Sindhudurg: अर्थसंकल्पात १५८ कोटींच्या विकासकामांना मान्यता; देवबाग समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:48 IST

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या ...

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे.तारकर्ली, देवबाग येथे वाहतूक कोंडी टाकण्यासाठी समुद्र आणि खाडीच्या बाजूने बंधारा कम रस्ता व्हावा, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या बंधारा कम रस्त्यामुळे किनारपट्टीची धूप रोखणे आणि सागरी अतिक्रमणापासून संरक्षण मिळण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठीही मोठा फायदा होणार आहे.यामध्ये देवबाग, तळाशील येथे किनारपट्टीची धूप थांबविण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अद्यावत ग्रोयन्स पद्धतीचे बंधारे उभारणे, देवबागमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारी बंधाराकम रस्ता करून घेणे, पर्यटनाच्या दृष्टीने मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर सुशोभीकरण करून बंधारा काम रस्ता तयार करणे आदी बाबींचा समावेश होता. यंदाच्या अर्थसंकल्पात मालवण किनारपट्टीवरील तब्बल १५८ कोटी रुपयांच्या विकासकांना मान्यता देण्यात आल्यामुळे आमदार नीलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले जात आहेत.आमदार नीलेश राणे यांची होती मागणीस्थानिक आमदार नीलेश राणे यांनी मालवणच्या किनारपट्टी भागाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालताना मुंबई येथे महाराष्ट्र सागरी मंडळच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत किनारपट्टीवरील महत्त्वाकांक्षी योजनांची संकल्पना मांडली होती.न्याय देणारा अर्थसंकल्प : राणेमाझ्या मतदारसंघातील देवबाग किनारपट्टीवरील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.‘लोकमत’ने उठविला वेळोवेळी आवाजदेवबागमधील वाहतूक कोंडी, सागरी अतिक्रमण, किनारपट्टीची धूप आदी प्रश्नांवर ‘लोकमत’मधून सातत्याने आवाज उठविण्यात आला होता. तारकर्ली देवबागमध्ये खाडी आणि समुद्राच्या बाजूने रिंग रोड झाल्यास तारकर्ली, देवबाग गावांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. सागरी अतिक्रमणाबरोबरच वाहतूक आणि पर्यटनातील अडथळ्यांमधून नागरिकांची सुटका होईल याकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025