शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वायंगवडे धनगरवाडीकडे लक्ष देण्याची मागणी, नाना शिंदे, रामा शिंदे यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:19 IST

मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीठ करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आहे.

ठळक मुद्देधनगरवाडीकडे लक्ष देवून वाडीचा शासनाने विकास करावा वाडीतील ग्रामस्थांना अद्यापही करावी लागते पायपीट

सिंधुदुर्गनगरी ,दि. ०२ : मालवण तालुक्यातील वायंगवडे धनगरवाडी गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित आहे. या धनगरवाडीतील ग्रामस्थांना अद्यापही पायपीट करावी लागत आहे. या वाडीकडे आतातरी शासनाने लक्ष दयावा अशी मागणी वायंगवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थ नाना शिंदे, रामा शिंदे यांनी केली आहे.

वायंगवडे गावातील धनगरवाडी गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित आहे. या वाडीकडे कॉंग्रेस सरकारने दुर्लक्ष केलाच मात्र आता विद्यमान शासनही या वाडीकडे दुर्लक्ष करीत आहे. या वाडीचा आतापर्यंत कोणताच विकास झालेला नाही. या वाडीत ना लाईट आहे, ना रस्ता व पाणी नाही. ही वाडी डोंगरात वसलेली असल्याने येथील मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. एखादा रुग्ण असल्यास त्याला खांद्यावरून घेवून यावे लागते.

वाडीत लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांपासून बचावांसाठी जिव मुठित धरून वास्तव करावे लागते. विकसित होत चाललेल्या महाराष्ट्र राज्यात ही वाडी विकासापसून वंचित राहिली आहे.

याकडे ना कॉंग्रेस सरकारने लक्ष दिले ना विद्यमान सरकारने. झपाट्याने विकास होणाऱ्या महाराष्ट्रातील शासनाने या धनगरवाडी कडे लक्ष देवून या वाडीचा विकास करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ राजन मोडक, रामा शिंदे व नाना शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :talukaतालुकाkonkanकोकण