शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दाभोलीत वीज वाहिनीमुळे धोका,ग्रामस्थांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 10:24 IST

mahavitaran Sindhudurg- कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदाभोलीत वीज वाहिनीमुळे धोका,ग्रामस्थांचा उद्रेक जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग : कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.

यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तरी ही विद्युतलाईन भविष्यातील धोका लक्षात घेऊन भूमिगत पद्धतीने घालून शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करावे, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने नवीन ११ केव्हीची विद्युतलाईन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे घालण्यात येत आहे. या विद्युतलाईनच्या लगत रहिवासी घरे, प्राथमिक शाळा, मंदिरे, शेती आणि बागायती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या विद्युत लाईनकरिता विरोध आहे. तरी संबंधित विद्युतलाईन जास्त क्षमतेची व अतिशय धोकादायक असल्याने ती घरांपासून तसेच प्राथमिक शाळा, मंदिरे यापासून लांब असावी.

स्थानिक ग्रामस्थांना असलेला भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार संबंधित लाईन विद्युत खांबावरून न घेता संपूर्णपणे भूमिगत पद्धतीने घेण्यात यावी. याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहेत.मात्र, असे निदर्शनास आले की, हे काम करताना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून पोलीस दलाचे सहकार्य घेऊन दमदाटीने ही विद्युत लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. याला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावानवीन ११ केव्ही विद्युत लाईन रस्त्यावरून गेल्याने भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना होणारा भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार हे काम करण्यात यावे. पोलीस दलाकडून दमदाटीचा वापर न करता सहकार्याच्या भूमिकेने व शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अन्यथा उद्रेक झाल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, विद्युत महामंडळ तसेच पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील. तरी याबाबत आपण लक्ष घालून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिले आहे व त्यांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग