शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलीत वीज वाहिनीमुळे धोका,ग्रामस्थांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 10:24 IST

mahavitaran Sindhudurg- कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदाभोलीत वीज वाहिनीमुळे धोका,ग्रामस्थांचा उद्रेक जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग : कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.

यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तरी ही विद्युतलाईन भविष्यातील धोका लक्षात घेऊन भूमिगत पद्धतीने घालून शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करावे, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने नवीन ११ केव्हीची विद्युतलाईन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे घालण्यात येत आहे. या विद्युतलाईनच्या लगत रहिवासी घरे, प्राथमिक शाळा, मंदिरे, शेती आणि बागायती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या विद्युत लाईनकरिता विरोध आहे. तरी संबंधित विद्युतलाईन जास्त क्षमतेची व अतिशय धोकादायक असल्याने ती घरांपासून तसेच प्राथमिक शाळा, मंदिरे यापासून लांब असावी.

स्थानिक ग्रामस्थांना असलेला भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार संबंधित लाईन विद्युत खांबावरून न घेता संपूर्णपणे भूमिगत पद्धतीने घेण्यात यावी. याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहेत.मात्र, असे निदर्शनास आले की, हे काम करताना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून पोलीस दलाचे सहकार्य घेऊन दमदाटीने ही विद्युत लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. याला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावानवीन ११ केव्ही विद्युत लाईन रस्त्यावरून गेल्याने भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना होणारा भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार हे काम करण्यात यावे. पोलीस दलाकडून दमदाटीचा वापर न करता सहकार्याच्या भूमिकेने व शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अन्यथा उद्रेक झाल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, विद्युत महामंडळ तसेच पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील. तरी याबाबत आपण लक्ष घालून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिले आहे व त्यांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग