शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

ओटवणेत दूरध्वनी सेवा केंद्राची भिंत कोसळून हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:17 IST

सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले होते. रविवारी आंबेगाव येथील घराचे छप्पर कोसळून दोन मुली जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी ओटवणे येथील दूरध्वनी सेवा केंद्राची भिंत कोसळली आहे. त्यामुळे ओटवणे परिसरातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत थोडा पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देओटवणेत दूरध्वनी सेवा केंद्राची भिंत कोसळून हानी सावंतवाडी परिसरात पावसाचा जोर ओसरला, नुकसानी मात्र सुरूच

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले होते. रविवारी आंबेगाव येथील घराचे छप्पर कोसळून दोन मुली जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी ओटवणे येथील दूरध्वनी सेवा केंद्राची भिंत कोसळली आहे. त्यामुळे ओटवणे परिसरातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत थोडा पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.गेले तीन दिवस सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पावसामुळे छोट्या-मोठ्या दुर्घटना घडत आहेत. ओटवणे येथील दूरध्वनी सेवा केंद्राची सोमवारी भिंत कोसळली.

आधीच ओटवणेबरोबरच पंचक्रोशीतील दूरसंचारच्या सेवेचे तीनतेरा वाजले असताना ऐन चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवरच या दूरध्वनी केंद्राची भिंत कोसळल्यामुळे दूरध्वनीसेवा पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. गेली कित्येक वर्षे या सेवा केंद्राची अवस्था असून नसल्यासारखी आहे. त्यातच आता इमारतीची भिंत कोसळल्याने आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर थोडा पावसाचा जोर ओसरला असून, सकाळच्या सत्रात पाऊस थोडा कमी होता.दूरसंचार विभागाचे लाखोंचे नुकसानना नियमित कर्मचारी ना नियमित सेवा अशी अवस्था दूरसंचार केंद्राची आहे. त्यातच इमारतीची वाईट अवस्था आहे. गेल्यावर्षीही या इमारतीचा काही भाग कोसळला होता.यात आर्थिक नुकसानीही झाली होती. पण याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे या इमारतीची आणखीनच वाईट अवस्था झाली. गेल्या वेळेप्रमाणे मशिनरी मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली. या घटनेमुळे दूरसंचार विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही इमारत गेल्या कित्येक वर्षांपासून निर्जीव अवस्थेत असूनही संबंधित यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अशी घटना घडली आहे. सुदैव म्हणजे याठिकाणी कोणी कर्मचारी उपस्थित नव्हता. कर्मचारी श्याम काजरेकर यांनी जाऊन या केंद्राची त्यानंतर पाहणी केली. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग