शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

उपरकर यांच्यावरील टीकेला दाभोलकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:40 IST

प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देप्रेमानंद देसाई यांच्या परशुराम उपरकर यांच्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तरस्वयंघोषित नेत्यांना टीकेचा अधिकार नाही : राजन दाभोलकर

कणकवली : ज्या सरपंच संघटनेला घटनेत कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा स्वयंघोषित संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात राज्य व केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी कोणाला क्वारंटाईन करायचे तसेच दुकानबंदी, कंटेन्मेंट झोन मर्यादा, लोकांना दंड करणे वगैरे निर्णय घ्यायचे आहेत. नाशिकमध्ये व्यापारी व ग्रामपंचायतीने तसे निर्णय परस्पर घेतले होते. त्या विरोधात उच्च न्यायालयाने १३ जुलै २०२० रोजी तसे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार ग्रामपंचायतींना नाही असा निर्णय दिलेला आहे.त्या निर्णयाचा अभ्यास स्वयंघोषित सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी करावा.तसेच कोरोनाच्या या काळात बाधितांना क्वारंटाईन करणे, त्याचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून आवश्यक नियमावली तयार करणे, टाळेबंदी करणे किंवा लॉकडाऊन करणे हे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र व राज्य सरकार यांना आहेत.

ते अधिकार ग्रामपंचायतींना दिलेले नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही सरपंचांच्या संघटनांनासुद्धा अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्णयाचा अभ्यास प्रेमानंद देसाई यांनी करावा.त्याचप्रमाणे स्वयंघोषित अशा विशिष्ट सरपंच संघटनेतर्फे ते निर्णय घेत आहेत. परंतु अशा सरपंच संघटना जिल्ह्यात किती आहेत? ते सुद्धा त्यांनी जाहीर करावे. नुसती पत्रकबाजी करून स्वत: नेता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करू नये.

प्रेमानंद देसाई यांनी त्यांच्या केर गावातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता माती उत्खननामुळे ढासळल्याने शिरवलमार्गे जाणारा रस्ता भर पावसात बंद झाला आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली व त्यातील माती धरणात गेली. त्या गावातील समस्येकडे दुर्लक्ष करून जगाच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वत:च्या गाव विकासाकडे लक्ष द्यावे.शिरवल व केरमधल्या काही जमिनी बोगस माणसे दाखवून खरेदी करण्यात आल्या आहेत. ते शोधून जमीनदारांच्या पाठीशी उभे राहून मनसे जमिनी खरेदी करणाऱ्यांची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही.

सरपंच हे पद गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्माण केलेले असते. त्यामुळे सरपंचांकडून तसे काम कितपत होते? हेही देसाई यांनी सांगावे, असेही दाभोलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग