शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

उपरकर यांच्यावरील टीकेला दाभोलकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:40 IST

प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देप्रेमानंद देसाई यांच्या परशुराम उपरकर यांच्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तरस्वयंघोषित नेत्यांना टीकेचा अधिकार नाही : राजन दाभोलकर

कणकवली : ज्या सरपंच संघटनेला घटनेत कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा स्वयंघोषित संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात राज्य व केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी कोणाला क्वारंटाईन करायचे तसेच दुकानबंदी, कंटेन्मेंट झोन मर्यादा, लोकांना दंड करणे वगैरे निर्णय घ्यायचे आहेत. नाशिकमध्ये व्यापारी व ग्रामपंचायतीने तसे निर्णय परस्पर घेतले होते. त्या विरोधात उच्च न्यायालयाने १३ जुलै २०२० रोजी तसे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार ग्रामपंचायतींना नाही असा निर्णय दिलेला आहे.त्या निर्णयाचा अभ्यास स्वयंघोषित सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी करावा.तसेच कोरोनाच्या या काळात बाधितांना क्वारंटाईन करणे, त्याचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून आवश्यक नियमावली तयार करणे, टाळेबंदी करणे किंवा लॉकडाऊन करणे हे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र व राज्य सरकार यांना आहेत.

ते अधिकार ग्रामपंचायतींना दिलेले नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही सरपंचांच्या संघटनांनासुद्धा अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्णयाचा अभ्यास प्रेमानंद देसाई यांनी करावा.त्याचप्रमाणे स्वयंघोषित अशा विशिष्ट सरपंच संघटनेतर्फे ते निर्णय घेत आहेत. परंतु अशा सरपंच संघटना जिल्ह्यात किती आहेत? ते सुद्धा त्यांनी जाहीर करावे. नुसती पत्रकबाजी करून स्वत: नेता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करू नये.

प्रेमानंद देसाई यांनी त्यांच्या केर गावातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता माती उत्खननामुळे ढासळल्याने शिरवलमार्गे जाणारा रस्ता भर पावसात बंद झाला आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली व त्यातील माती धरणात गेली. त्या गावातील समस्येकडे दुर्लक्ष करून जगाच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वत:च्या गाव विकासाकडे लक्ष द्यावे.शिरवल व केरमधल्या काही जमिनी बोगस माणसे दाखवून खरेदी करण्यात आल्या आहेत. ते शोधून जमीनदारांच्या पाठीशी उभे राहून मनसे जमिनी खरेदी करणाऱ्यांची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही.

सरपंच हे पद गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्माण केलेले असते. त्यामुळे सरपंचांकडून तसे काम कितपत होते? हेही देसाई यांनी सांगावे, असेही दाभोलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग