शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

उपरकर यांच्यावरील टीकेला दाभोलकर यांचे जोरदार प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:40 IST

प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देप्रेमानंद देसाई यांच्या परशुराम उपरकर यांच्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तरस्वयंघोषित नेत्यांना टीकेचा अधिकार नाही : राजन दाभोलकर

कणकवली : ज्या सरपंच संघटनेला घटनेत कोणताही कायदेशीर आधार नाही, अशा स्वयंघोषित संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात राज्य व केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी कोणाला क्वारंटाईन करायचे तसेच दुकानबंदी, कंटेन्मेंट झोन मर्यादा, लोकांना दंड करणे वगैरे निर्णय घ्यायचे आहेत. नाशिकमध्ये व्यापारी व ग्रामपंचायतीने तसे निर्णय परस्पर घेतले होते. त्या विरोधात उच्च न्यायालयाने १३ जुलै २०२० रोजी तसे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार ग्रामपंचायतींना नाही असा निर्णय दिलेला आहे.त्या निर्णयाचा अभ्यास स्वयंघोषित सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी करावा.तसेच कोरोनाच्या या काळात बाधितांना क्वारंटाईन करणे, त्याचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून आवश्यक नियमावली तयार करणे, टाळेबंदी करणे किंवा लॉकडाऊन करणे हे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र व राज्य सरकार यांना आहेत.

ते अधिकार ग्रामपंचायतींना दिलेले नाहीत, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही सरपंचांच्या संघटनांनासुद्धा अशाप्रकारचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्णयाचा अभ्यास प्रेमानंद देसाई यांनी करावा.त्याचप्रमाणे स्वयंघोषित अशा विशिष्ट सरपंच संघटनेतर्फे ते निर्णय घेत आहेत. परंतु अशा सरपंच संघटना जिल्ह्यात किती आहेत? ते सुद्धा त्यांनी जाहीर करावे. नुसती पत्रकबाजी करून स्वत: नेता असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करू नये.

प्रेमानंद देसाई यांनी त्यांच्या केर गावातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता माती उत्खननामुळे ढासळल्याने शिरवलमार्गे जाणारा रस्ता भर पावसात बंद झाला आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली व त्यातील माती धरणात गेली. त्या गावातील समस्येकडे दुर्लक्ष करून जगाच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वत:च्या गाव विकासाकडे लक्ष द्यावे.शिरवल व केरमधल्या काही जमिनी बोगस माणसे दाखवून खरेदी करण्यात आल्या आहेत. ते शोधून जमीनदारांच्या पाठीशी उभे राहून मनसे जमिनी खरेदी करणाऱ्यांची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही.

सरपंच हे पद गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्माण केलेले असते. त्यामुळे सरपंचांकडून तसे काम कितपत होते? हेही देसाई यांनी सांगावे, असेही दाभोलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग