शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांत अनास्था; शासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:10 IST

ग्राहक पंचायत : ग्राहक जागृतीच्या कार्यासाठी कार्यकर्ते मिळत नसल्याने चळवळीला अडसर--जागतिक ग्राहक दिन

ग्राहक हक्कांचे संरक्षण होण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अशा : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे समाधानकारक निर्णय मिळाला नाही तर ग्राहकांना थेट राज्य मंचाकडे जावे लागते. त्यामुळे हे अंतर, होणारा खर्च आणि लागणारा वेळ यामुळे ग्राहकाची याबाबत अनुत्सुकता दिसते. यासाठी तक्रार निवारण मंच विभागीयस्तरावर व्हायला हवेत. महावितरणच्या तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक संघटनेला तक्रार करण्याचा अधिकार असावा. त्यादृष्टीने महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे (सी. जी. आर. एफ.) च्या नियमात बदल करायला हवेत. सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची कार्यपद्धत सूटसुटीत असावी. त्यात स्थानिक उमेदवार सदस्य असावा.शोभना कांबळे ल्ल रत्नागिरीग्राहकांमध्ये आपल्या हक्कांबाबत अनास्था आहे. त्याचबरोबर ग्राहकाभिमुख निर्णयाच्या योग्य अंमलबजावणीसाठी शासनही अनुकूल नाही, त्यामुळे ग्राहक चळवळ पुढे जाण्यात मोठा अडसर होत आहे. ग्राहक जागृतीचे अनेक कार्यक्रम घ्यायला ग्राहक मंच तयार आहे. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत येथील ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप भावे आणि कार्यवाह सुहास माईणकर यांनी व्यक्त केली. जागतिक ग्राहक दिनाच्या अनुषंगाने ते ‘लोकमत’शी बोलत होते.रत्नागिरी जिल्ह्यात ग्राहक पंचायत ही संघटना १९९८पासून ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. या संघटनेतर्फे दर शनिवारी ग्राहक मार्गदर्शन केंद्र मोफत चालविले जाते. त्याचप्रमाणे माहिती अधिकाराच्या कार्यशाळाही गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. शाळा, महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.महावितरण, दूरध्वनी, सदनिकाधारक, विविध उत्पादने, फसव्या जाहिराती यात प्रामुख्याने ग्राहकांच्या फसवणुकीचे तसेच त्यांचे हक्क डावलल्याच्या अनेक तक्रारी ग्राहक पंचायतीकडे येतात. या संस्था लोकांच्या अगतिकतेचा फायदा उठवतात. वीज, दूरध्वनी आणि बांधकाम या सर्वव्यापी क्षेत्रात ग्राहकांच्या समस्या सर्वाधिक आहेत, अशी माहिती यावेळी माईणकर यांनी दिली. मुळात अजूनही बऱ्याचशा ग्राहकांना आपल्या हक्कांबाबत माहितीच नाही. त्याचबरोबर न्यायासाठी चिकाटीने लढण्याचीही ग्राहकांची तयारी नसते. आता ग्राहक क्षेत्र जेवढे व्यापक बनू लागले आहे. तेवढेच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र, तरीही ग्राहक म्हणावा तेवढा अजूनही जागरूक नाही. सध्या सदनिकाधारकांच्या समस्यांमध्ये पहिली समस्या म्हणजे विकासकाने सोसायटी तयार न करणे आणि केलेली असली तरी त्या जागेचे अभिहस्तांतरण (कन्व्हेन्स डीड) न करणे. याबाबत सोसायटीच्या सभासदांना मोफत माहिती देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, त्यासाठी सोसायट्याच पुढे यायला तयार नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे या दोघांनी म्हटले.ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत बोलताना माईणकर म्हणाले की, अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून आपली सतत फसगत होत असते. कपड्याच्या खरेदीला गेल्यानंतर पावतीवर ‘रंगाची गॅरेंटी नाही’ आणि ‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही’, असे लिहिलेले असते, हेच चुकीचे असून, ग्राहकहक्काला बाधक आहे. सध्या वस्तूंच्या एम. आर. पी.वर शासनाचे नियंत्रणच राहिलेले नाही. बरेचदा विक्रेता ग्राहकांना पावती देत नाही. त्यामुळे तक्रार कुणाविरूद्ध करायची, याचा काही पुरावाच राहात नाही. ग्राहकांनीही पावतीच्या बाबतीत आग्रही राहायला हवे. ग्राहक पंचायतीकडे सर्वांत जास्त तक्रारी वीज मंडळाविरोधातील येतात. जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करून अनेक वर्षे झाली तरीही जिल्ह्यातील ३२,००० ग्राहकांच्या अनामत रकमा अद्याप या मंडळाने दिलेल्या नाहीत. खरंतर महावितरणने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरी भागातील ग्राहकांची ३० दिवसांच्या आत आणि ग्रामीण भागातील ग्राहकांच्या ४५ दिवसांच्या आत ही रक्कम परत करावी आणि रक्कम दिल्यानंतर ६० दिवसांच्या आत भरपाई द्यावी. मात्र, अजूनही हजारो ग्राहकांना ही रक्कम मिळालेली नाही. याबाबत प्रातिनिधीक स्वरूपात ४८ ग्राहकांच्या वतीने ग्राहक मंचाने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. यात जानेवारी २०१६मध्ये निर्णय ग्राहकांच्या बाजूने लागला. मात्र, अजूनही या ४८ ग्राहकांना त्यांची अनामत रक्कम मिळालेली नाही. खरंतर अनामत रक्कम मिळाल्यावर त्याच्या भरपाईची मागणीही ग्राहकांनी करायला हवी, हेच ग्राहकांना माहीत नसल्याचे माईणकर यांनी सांगितले.या सर्व प्रकारांमुळे ग्राहकच अधिक गोंधळलेला आहे. पण असंघटित असल्याने फसवणुकीचा बळी ठरत असल्याचे मत या दोघांनी व्यक्त केले.ग्राहक जागृतीसाठी ग्राहक पंचायत अनेक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात माहिती अधिकाराची माहिती, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कार्यक्रम, ग्राहकांचे हक्क याविषयी माहिती देण्यास ग्राहक पंचायत सहकार्य करण्यास तयार आहे, असे पत्र रत्नागिरीतील पाच ग्रामपंचायतींना पाठविले होते. मात्र, एकाही ग्रामपंचायतीने तयारी दाखविली नसल्याची खंतही या दोघांनी व्यक्त केली.शालेयस्तरावर शासन निर्णयानुसार निवडक शाळांमध्ये ग्राहक गट स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृती होण्यास प्रारंभ झाला होता. यासाठी ग्राहक पंचायत नोडल एजन्सी म्हणून काम पाहात होती. दोन वर्षे हा उपक्रम सुरू होता. मात्र, तिसऱ्या वर्षी शासनाने निधीच न दिल्याने हाही उपक्रम बंद पडला असल्याची माहिती माईणकर यांनी दिली. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांचे हक्क शाबित राहावेत, असे शासनाला वाटत असेल तर ग्राहकाभिमुख निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हायला हवी. यासाठी शासनाने ग्राहक कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या करायला हवी, असे मत अध्यक्ष अ‍ॅड. भावे व्यक्त करतात.