शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 18:27 IST

अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.

आरोस : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतू सिंधुदुर्गवासीयांना काल, शुक्रवारी एका दिवसात पाहायला मिळाले. सकाळी पहाटेची थंडी, त्यानंतर कडक उन्ह आणि दुपारनंतर अवकाळी पावसाची मोठी सर कोसळली. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.बांदा दशक्रोशीला अवकाळी पावसाने अर्धा तास झोडपले. तसेच परिसरात गावातील काढणीयोग्य पिकलेले लाल झालेले नाचणी कणस व उडवी करून ठेवलेल्या भात पिकांचे व विलवडे येथील कनगी (कंदमुळे) चे  नुकसान होण्याची शक्यता आहे.    सायंकाळी उशिरा पर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे आंबा व काजूवर केलेल्या दोन फवारण्या वाया जाणार असल्याने बागायतदार चिंतातुर झाले आहेत. अवकाळी पाऊस असाच सुरु राहल्यास सर्व मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.बांदा, पाडलोस, मडुरा, शेर्ले, रोणापाल, विलवडे, कास, इन्सुली, वाफोली,डेगवे  परिसरात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. मळणीसाठी तयार करून ठेवलेली भाताची उडवी झाकण्यासाठी शेतकरी धडपडत होते.

तर आंबा व काजूवर सुरू असलेली फवारणी काही बागायतदारांना बंद करावी लागली. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या फवारणीचा खर्च पाण्यात गेल्याचे बागायतदारांनी सांगितले. मात्र या अवकाळी पावसाने बागायतदारांसह छोट्या शेतकऱ्यांचीही झोप उडवली. बांदा शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी अचानक आलेल्या पावसामुळे दुकानांचा आसरा घेतला.दरम्यान, शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत व कर्जदार आंबा व काजू बागायतदारांना अनुदान स्वरूपात दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी दमदार पाऊस झाला आहे. आक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होताच आता नोव्हेबरमध्येही पाऊस पडत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस