शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 18:38 IST

Vinayak Raut shivsena Kankavli Sindhudurg-शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देफक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

कणकवली : शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यांचे विविध घोटाळे आम्हाला माहीत असून विनाकारण आमच्या कोणी वाकड्यात शिरले तर त्याला सरळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. कणकवली येथील महाडिक कंपाऊंड परिसरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, कामगार नेते निलेश पराडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, बाळा भिसे, महिला जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, शैलेश भोगले, मिलिंद साटम, रवींद्र जोगल, विलास साळसकर, सुशांत नाईक, गितेश कडू, दिगंबर पाटील, राजू राठोड, प्रथमेश सावंत, हर्षद गावडे आदी उपस्थित होते.विनायक राऊत म्हणाले, उद्याच्या महा विकास आघाडीच्या आमदाराचे हे कार्यालय आहे. विकासाचे शिवधनुष्य उदय सामंत आणि माझ्याकडे आहे. मतदारसंघाशी आमचे घट्ट नाते असून राणेंनी त्यांच्या पदाला शोभेल अशी टीका करावी. तुम्हाला शिवसेनेने मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. उद्धव ठाकरे दुष्मनावर सुद्धा प्रेम करतात. असेही ते म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले, पोपट पंची करणारा माजी आमदार मला शिव्या घालणार असेल तर घालू दे. मात्र , मी रिफायनरीचे समर्थन करणार नाही. आम्ही इनोव्हेशन कोकण योजना आणणार आहोत. मी खासदार झालो तेव्हा चिपी विमानतळाचे १४ टक्के फक्त काम झाले होते. आता काम पूर्णत्वास जात आहे. २५०० रुपयात मुंबईला जाता येणार आहे. तेथून दररोज विमाने विविध ठिकाणी जाणार आहेत.

जिल्ह्यातील पाणी पुरवठा प्रकल्प आहेत त्यांची पाहणी आम्ही करणार असून येत्या तीन वर्षात ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी अरूण दुधवडकर, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, निलम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले.आता पेटून उठले पाहिजेज्यांच्याजवळ विकासाचे काहीच मुद्दे नाहीत ते नुसती टीका करीत आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतीबरोबरच आगामी सर्व निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी आता पेटून उठले पाहिजे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांना सरंक्षण तर मिळेलच. पण , त्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून आम्ही सर्वजण असू ,असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली