शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

राजकीय दबावामुळे चोरटे मोकाट; बंगला फोडला, रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:04 IST

शहरातील नावळे मार्गालगतचा बंगला दोन चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील कपाटातून ५0 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, राजकीय दबावामुळे तक्रार दाखल होवू न शकल्याने पोलिसांनी संशयितांना सोडून दिले.

 

वैभववाडी : शहरातील नावळे मार्गालगतचा बंगला दोन चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील कपाटातून ५0 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, राजकीय दबावामुळे तक्रार दाखल होवू न शकल्याने पोलिसांनी संशयितांना सोडून दिले. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.     शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये तिरवडे तर्फ खारेपाटण येथील सुहासिनी सुभाष घुगरे यांचा नावळे मार्गालगत बंगला आहे. या बंगल्याच्या दर्शनी भागातील खिडकीची अ‍ॅल्युमिनियमची जाळी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शयनगृहातील पलंगाच्या कप्प्यातील कपडे व सामान विस्कटून टाकले. त्यामध्ये काहीच हाती न लागल्यामुळे चोरट्यांनी कपाट फोडून ५0 हजार हजार रुपये लंपास केले. हा सगळा प्रकार बंगल्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.कामगारांची मंजुरी देण्यासाठी ही रक्कम घुगरे यांनी कपाटात ठेवली होती. सकाळी हा प्रकार लक्षात येताच मुंबईस्थित घुगरे यांनी दूरध्वनीवरुन तिरवडे येथील शेजारी घुगरे यांना चोरीची कल्पना दिली. त्यामुळे घुगरे वैभववाडीत पोहोचले. तत्पूर्वीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेजवरुन दुपारी लागलीच संशयित तरुणांना ताब्यात घेतले. फूटेजवरुन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती शहरात पसरताच काही राजकीय व्यक्तींनी पोलीस ठाण्यात धाव घेत बंगल्याच्या मालकाशी संपर्क साधून प्रकरणाची मांडवली सुरु केली.सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. चोरीचे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय व्यक्तींचा दबाव वाढल्यामुळे कपाटातील ५0 हजार रुपये चोरीला गेले म्हणून सकाळी सांग-याने तक्रारदाराने सायंकाळी बंगल्यातून काहीच चोरीला गेले नसल्याचे सांगत चोरीबाबत तक्रार द्यायची नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे राजकीय व्यक्तींच्या साथीने सीसीटीव्हीत कैद झालेला गंभीर गुन्हा दडपण्यात वैभववाडी पोलीस यशस्वी झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.पोलीस अधीक्षक मेहरबान कशासाठी ?वैभववाडी तालुक्यात गेल्या तीन महिन्यात विविध प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे घडले. त्यातील काही गुन्हे दाखलच होऊ शकले नाहीत. तर जे दाखल झाले त्या गुन्ह्यांची मांडवलीतून तीव्रता कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न झाला. त्यामध्ये शहरातील या धाडसी चोरीची भर पडली आहे. सीसीटीव्ही कॅमे-याच्या फूटेजवरुन चोरट्यांना ताब्यात घेऊनसुद्धा राजकीय दबावामुळे चोरी दडपण्यात पोलीस यशस्वी झाले. पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम वैभववाडी पोलिसांवर एवढे मेहेरबान का? वैभववाडी पोलिसांवरील हा डाग ते पुसणार कसा? असा प्रश्न शहरात उपस्थित केला जाऊ लागला आहे.पुरावे नसल्यामुळे सोडले : नितीन केरामचोरीची घटना आणि न झालेल्या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांच्याशी संपर्क साधला असता, चोरीबाबत आमच्याकडे तक्रार दाखल झाली नाही. तसेच ताब्यात घेतलेल्या संशयिताविरुद्ध कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. त्यामुळेच संशयिताला सोडावे लागले, असे केराम यांनी सांगितले.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा