शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

CoronaVirus बिहारी कामगारांसाठी खासदारांना लालू पुत्राचा फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 22:50 IST

सिंधुदुर्गातील कामगारांची स्थिती घेतली जाणून : कामगारांना तेजस्वी यादव स्वखर्चाने बिहारला नेणार

-  अनंत जाधव सावंतवाडी : कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले खरे मात्र यामुळे अनेक मजूर कामगार वेगवेगळ्या राज्यात तसेच जिल्ह्यात, शहरात अडकून पडले आहेत. तसेच बिहारमधील काही कामगार सिंधुदुर्गमध्ये अडकून पडले आहेत. याचा आकडा हा चारशे ते पाचशेच्या घरात आहे. मात्र या कामगारांच्या मदतीसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव धावून आले आहेत. तेजस्वी यांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी संर्पक करत बिहारमधील कामगारांना आपल्या खर्चाने घेऊन जाणार असल्याचे सांगितल्याने अनेक बिहारी कामगारांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.

केंद्र व राज्य सरकारने परराज्यातील कामगारांची यादी बनविण्याचे आदेश दिल्यानंतर आता त्यांना आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी तेथील नेत्यांनीही कंबर कसली आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक राज्यातील कामगार मजूर देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. तसे ते महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातही अडकले आहेत. त्यात सिंधुदुर्गमध्ये चारशे ते पाचशे मजूर आहेत. यातील अनेक मजूर हे समुद्रात वाळू काढण्यासाठी किंवा कात भट्टीवर काम करतात तर काही मजूर हे शासकीय ठेकेदारांकडे बिल्डीगचे काम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी आलेले आहेत. यातील काही मजूर हे सावंतवाडी तालुक्यात आहेत. या मजूरांची निश्चीत अशी संख्या माहिती नसली तरी तो आकडा दोनशेच्या जवळपास जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.यातील अनेक कामगार हे पहिल्यापासूनच आम्हाला घरी सोडा म्हणून मागे लागले आहेत. काही जण तर चालत जाण्याच्या विचारात होते. पण पोलिसांनी त्यांना परतवून लावले. अशातच आता केंद्र व राज्य सरकारने परराज्यातील मजूरांबाबत सहानुभूतीचा विचार करत या सर्व मजूरांना गावी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रथम एसटीचा पर्याय ठेवण्यात आला होता. यामध्ये मात्र कामगारांची आयुष्यभराची कमाई एका वेळी जाणार अशीच वेळ आली आहे. कामगारांना बिहारला सोडण्यासाठी एसटीचे भाडे तब्बल अडीच लाख रूपये आकारण्यात येणार आहे. तर अनामत रक्कम ही पाच लाख असणार आहे. एसटीच्या या अवास्तव मागणी ऐकून अनेकांचे डोळेच पांढरे झाले आहेत.

मात्र ही स्थानिक पातळीवर कामगारांना सोडण्याची तसेच त्यांच्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू असतानाच शनिवारी रात्री उशिरा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा माजी उपुख्यमंत्री तेजस्वी यादव याने थेट खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क करत बिहारमधील कामगारांना आम्ही स्वखर्चाने घेऊन जातो असे सांगितले. खासदार यांनी याबाबत पालकमंत्री तसेच अन्य जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून, यावर लवकरात लवकर निर्णय घ्या, असे सांगितले आहे.रविवारी बिहारी कामगारांना बिहारला सोडण्याबाबत तळवडे येथील काहींनी पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी तोडगा काढला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता कोणत्या स्वरूपाचा तोडगा निघणार हे लवकरच कळणार आहे. पण तेजस्वी यादव यांनी स्वत: पुढाकार घेत कामगारांना घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील प्रशासन तसेच ठेकेदार यांच्यावरचा ताण थोडासा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच बिहारच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

अन्यथा या कामगारांना घरी जाण्यासाठी कोण पैसे भरणार या विवंचनेत थांबावे लागणार होते. आता थेट बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यानेच या कामगारांची जबाबदारी घेतल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. मात्र या कामगारांना कसे घेऊन जायचे यावर अद्याप निर्णय झाला नसून, ही प्राथमिक स्तरावरची बोलणी सुरू आहेत. अन्यथा काही कात भट्टी व्यावसायिकांनाही गाडी भाडे व अनामत रक्कमेचा भुर्दंड सहन करावा लागला असता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVinayak Rautविनायक राऊत BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादव