शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:14 IST

शासन आणि प्रशासनाचे प्रतिकुल धोरण, एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम यासह विविध अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, असे मत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे !हनुमंत ताटे यांचे मत; कामगारांना दिलासा देण्याची मागणी

कणकवली : शासन आणि प्रशासनाचे प्रतिकुल धोरण, एसटीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम यासह विविध अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, असे मत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी व्यक्त केले आहे.

सर्व सामान्य जनतेच्या लालपरीने आता ७३ व्या वर्षात पदार्पण केले आहे . गेल्या ७२ वर्षामध्ये महामंडळाने अनेक चढउतार पाहिले , अन्याय सहन केले , परंतू प्रवाशी सेवेचे व्रत सोडले नाही. आता कोरोनाच्या संकटामुळे लालपरीच्या चाकाची गती काहीशी रोखली गेली आहे .१ जून १९४८ मध्ये केवळ ३६ बेडफोर्ड गाड्यांच्या सहाय्याने निरनिराळ्या १५० मार्गांवर एसटी महामंडळाची वाहतूक सुरू झाली .  हळहूळ या वाहतूकीचा विस्तार होऊन १ ९७४-७५ मध्ये महाराष्ट्रात प्रवाशी वाहतूकीची संपूर्णपणे राष्ट्रीयीकरण झाले. आज रोजी महामंडळ संपूर्ण राज्यात १८००० गाड्यांच्या सहाय्याने दररोज सुमारे ६५ लाख प्रवाशांची वाहतूक सेवा करत आहे . रस्ता तेथे एसटी या उद्दिष्टपूर्तीचा तसेच ग्रामीण व दुर्गम भागात प्रवाशी सेवेचा विस्तार करण्याचा ध्यास घेत राज्य परिवहन महामंडळाने मोलाचे योगदान दिले आहे .त्यामुळेच आज एसटी महामंडळास राज्याची जीवनवाहिनी मानले जाते. मात्र आज एसटी महामंडळास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . विविध पथकरांच्या ओझ्याखाली महामंडळ दबले आहे. प्रवाशी सवलतीची प्रतिपूर्ती शासनाकडून वेळेवर होत नाही .डिझेलच्या दरात होणारी वाढ , टायर व सुट्या भागांच्या किंमतीत झालेली वाढ , अवैध प्रवाशी वाहतूक यामुळे एसटी महामंडळ २०१२-१३ पासून तोट्याच्या दिशेने गेले . २०१४ पासून २०१९ -२० पर्यंत तोटा १६८५ कोटींवरून साडेपाच हजार कोटींपर्यंत गेला आहे .सध्या कोरोना संकटामुळे एसटी वाहतूक गेले अडीच महिने पूर्णपणे ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुरू असली तरी महामंडळास ती परवडत नाही. त्यामुळे महामंडळाचा आर्थिक तोटा आणखी वाढला आहे . प्रतिकूल परिस्थितीत एसटी महामंडळाचे कामगार काम करत आहेत .कामगारांचे वेतनही वेळेवर होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून एसटीच्या उत्पन्नवाढीकरता शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे . एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी एसटी महामंडळ राज्यशासनात विलीन करण्याची गरज आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून त्यांच्याप्रमाणेच वेतन व भत्ते दिले पाहिजेत. तसे केल्यास राज्यातील सामान्य जनतेस किफायतशीर दरात दर्जेदार प्रवाशी वाहतूक सेवा उपलब्ध होईल शिवाय एसटी कर्मचाऱ्यांनाही चांगले दिवस येतील असेही हनुमंत ताटे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग