शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Coronavirus: कोरोनामुळे वर्षभर उभ्या राहूनही सावंतवाडी आगाराच्या बसेस तंदुरुस्त, असं केलं नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:38 IST

ST Bus News:  कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे.

- रजत सावंतसावंतवाडी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली असून, आजपासून काही ठिकाणी निर्बंध शिथिलही केले आहेत. कोरोनाने एकीकडे नागरिकांचे आराेग्य खालावत असताना वर्षभर आगारात उभ्या असलेल्या येथील एसटी आगाराच्या बसेसचे आराेग्य मात्र तंदुरुस्त असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे. सावंतवाडी आगाराच्या ७५ बसेस वाहतूक बंद राहिल्याने वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थही शहरात खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे प्रवासीच नसल्याने बस वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. टाळेबंदीमध्ये सावंतवाडी एसटी प्रशासनाने चार फेऱ्या चालू ठेवल्या आहेत. दरम्यान, टाळेबंदीच्या सुरुवातीला गेल्या वर्षी एसटी फेऱ्या बंद असल्याने त्यांचे काही भाग दुरुस्तीला येऊन सावंतवाडी आगाराला दिवसाला पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागले होते. यावर उपाय म्हणून सध्या एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या बस गाड्यांना तीन दिवसांनंतर आगारातील मोकळ्या जागेत फिरवून चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे एसटीच्या भागांची गंजल्यामुळे किंवा इतर कारणाने झीज होत नसल्याचे आगाराकडून सांगण्यात अाले. त्यामुळे सधा नादुरुस्त बसची संख्या शून्यवर आहे.

 सावंतवाडी आगराच्या एकूण बसेस -७५    टाळेबंदी काळात चालू बसेस - ४    उभ्या बसेस - ७१    नादुरुस्त बसेस - ० 

 वर्षातून फक्त सहा महिने रस्त्यावर टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरात एसटी सहा महिने चालू होती. सहा महिन्यांमध्ये सावंतवाडी आगराच्या ७५ बसेस ह्या प्रवाशांच्या सेवेसाठी आगाराबाहेर पडल्या होत्या. सद्यस्थितीत या आगराच्या चार एसटी फेऱ्या चालू आहेत.

आता खर्च किती येणारयाबाबत सावंतवाडी एसटी प्रशासनाला विचारले असता सध्या बसेस आगाराबाहेर जात नाहीत. त्यामुळे तीन दिवसांनी बसेस चालू करून आगाराच्या आवारात फिरवल्या जात आहेत. काही बस चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू करायच्या म्हटल्यास खर्च येणार नाही़. मात्र, काही बसना खर्च करावा लागत आहे.

 आधीच दुष्काळगेल्या वर्षभरात सावंतवाडी आगराची सहा महिने बस वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला १० कोटींचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या बंद असल्याने दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

बस गाड्या चांगल्या स्थितीत राहाव्यात आणि देखभाल दुरुस्ती खर्च कमी यावा म्हणून दर तीन दिवसांनी बस गाड्या चालू करून आगराच्या आवारात फिरवल्या जातात. त्यामुळे इंजिन तसेच टायर खराब होत नाहीत. असे केल्याने बसेस चालू करायच्या झाल्यास खर्च कमी होईल.   - आगार व्यवस्थापक, सावंतवाडी

टॅग्स :state transportएसटीSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग