शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Coronavirus: कोरोनामुळे वर्षभर उभ्या राहूनही सावंतवाडी आगाराच्या बसेस तंदुरुस्त, असं केलं नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:38 IST

ST Bus News:  कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे.

- रजत सावंतसावंतवाडी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली असून, आजपासून काही ठिकाणी निर्बंध शिथिलही केले आहेत. कोरोनाने एकीकडे नागरिकांचे आराेग्य खालावत असताना वर्षभर आगारात उभ्या असलेल्या येथील एसटी आगाराच्या बसेसचे आराेग्य मात्र तंदुरुस्त असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद असल्याने याचा मोठा फटका एसटी सेवेला बसत आहे. प्रवासी नसल्याने एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला अाहे. सावंतवाडी आगाराच्या ७५ बसेस वाहतूक बंद राहिल्याने वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थही शहरात खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे प्रवासीच नसल्याने बस वर्षभरापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. टाळेबंदीमध्ये सावंतवाडी एसटी प्रशासनाने चार फेऱ्या चालू ठेवल्या आहेत. दरम्यान, टाळेबंदीच्या सुरुवातीला गेल्या वर्षी एसटी फेऱ्या बंद असल्याने त्यांचे काही भाग दुरुस्तीला येऊन सावंतवाडी आगाराला दिवसाला पाच लाखांचे नुकसान सहन करावे लागले होते. यावर उपाय म्हणून सध्या एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या बस गाड्यांना तीन दिवसांनंतर आगारातील मोकळ्या जागेत फिरवून चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे एसटीच्या भागांची गंजल्यामुळे किंवा इतर कारणाने झीज होत नसल्याचे आगाराकडून सांगण्यात अाले. त्यामुळे सधा नादुरुस्त बसची संख्या शून्यवर आहे.

 सावंतवाडी आगराच्या एकूण बसेस -७५    टाळेबंदी काळात चालू बसेस - ४    उभ्या बसेस - ७१    नादुरुस्त बसेस - ० 

 वर्षातून फक्त सहा महिने रस्त्यावर टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरात एसटी सहा महिने चालू होती. सहा महिन्यांमध्ये सावंतवाडी आगराच्या ७५ बसेस ह्या प्रवाशांच्या सेवेसाठी आगाराबाहेर पडल्या होत्या. सद्यस्थितीत या आगराच्या चार एसटी फेऱ्या चालू आहेत.

आता खर्च किती येणारयाबाबत सावंतवाडी एसटी प्रशासनाला विचारले असता सध्या बसेस आगाराबाहेर जात नाहीत. त्यामुळे तीन दिवसांनी बसेस चालू करून आगाराच्या आवारात फिरवल्या जात आहेत. काही बस चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू करायच्या म्हटल्यास खर्च येणार नाही़. मात्र, काही बसना खर्च करावा लागत आहे.

 आधीच दुष्काळगेल्या वर्षभरात सावंतवाडी आगराची सहा महिने बस वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटीला १० कोटींचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या बंद असल्याने दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

बस गाड्या चांगल्या स्थितीत राहाव्यात आणि देखभाल दुरुस्ती खर्च कमी यावा म्हणून दर तीन दिवसांनी बस गाड्या चालू करून आगराच्या आवारात फिरवल्या जातात. त्यामुळे इंजिन तसेच टायर खराब होत नाहीत. असे केल्याने बसेस चालू करायच्या झाल्यास खर्च कमी होईल.   - आगार व्यवस्थापक, सावंतवाडी

टॅग्स :state transportएसटीSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग