शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

CoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:19 IST

मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.

ठळक मुद्देव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवादकोरोनाबाबतच्या समस्या लवकरच सोडवू  : नीतेश राणे यांचे आश्वासन 

देवगड : मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.आमदार राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सरपंचांना येणाऱ्या अडचणी व इतर गोष्टी यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी असे आश्वासन दिले आहे.राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था शाळा, अंगणवाड्यांमध्ये करण्याचा सूचना गाव व्यवस्थापन कमिटीला दिल्या आहेत. परंतु गावातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये जागा कमी पडत असून प्रशासन आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवगड तालुक्यातील सरपंचांनी सांगितले.

देवगड तालुक्यातील सरपंचांनी प्रशासना विरोधात नाराजीचा सूर लावला. आमदार राणे यांनी पोलीस प्रशासन व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरपंचांशी व्डिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आमदार राणे यांनी गाव पातळीवरील समस्या जाणून घेतल्या. शाळेत नेमण्यात आलेले शिक्षक त्यांच्या मूळ गावी गेले असल्याची खळबळजनक माहिती बापर्डे सरपंच संजय लाड यांनी दिली. त्यामुळे चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात येत असलेल्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. याबाबत प्रशासनाला विचारले असता अधिकारी एकमेकांवर ढकलत असल्याचे लाड यांनी सांगितले.हडपीड सरपंच दाजी राणे यांनी सांगितले की, शासनाने शाळेच्या १५ बाय १५ च्या एका खोलीत ३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. परंतु ५० व्यक्ती गावात आल्यास काय करायचे ? याचे उत्तर नसल्याचे त्यांनी सांगितले.

या महिन्यात लहान मुलांसाठी डोस असून तो पुढील महिन्यात घेण्यात यावा. कारण कोरोनासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारीच डोस देण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे डोस पुढील महिन्यात द्यावा, अशी मागणी वैभव साळसकर यांनी केली. विश्वनाथ खानविलकर यांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जागा अपुरी पडणार असून शासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही, असे यावेळी सांगितले.जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणारयावेळी नीतेश राणे म्हणाले, गावपातळीवरील यंत्रणा कशी राबवायची हे सर्व निर्णय शासनाने व गावातील नागरिकांनी घ्यायचे आहेत. या यंत्रणेला आम्ही मदत करू व तुमच्या सर्व समस्यांमध्ये लक्ष घालून जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे सांगत त्यांनी सर्व सरपंचांना तशी ग्वाही दिली. तसेच उद्यापर्यंत सर्व सरपंचांना पीपीई किट देणार असल्याचेही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग