शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

CoronaVirus Lockdown : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:19 IST

मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.

ठळक मुद्देव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवादकोरोनाबाबतच्या समस्या लवकरच सोडवू  : नीतेश राणे यांचे आश्वासन 

देवगड : मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या व्यवस्थेबाबत गावच्या सरपंचांना अनेक समस्या आहेत. क्वारंटाईन केंद्राची जबाबदारी सरपंचांवर आहे. मात्र, या केंद्राची रात्रीची जबाबदारी कोणावर याचे उत्तर राज्यसरकार देत नाही. सरपंचांना कोरोना मोहिमेत येणाऱ्या अडचणी संबंधितांशी बोलून सोडवू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.आमदार राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देवगड तालुक्यातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सरपंचांना येणाऱ्या अडचणी व इतर गोष्टी यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी असे आश्वासन दिले आहे.राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह इतर राज्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था शाळा, अंगणवाड्यांमध्ये करण्याचा सूचना गाव व्यवस्थापन कमिटीला दिल्या आहेत. परंतु गावातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये जागा कमी पडत असून प्रशासन आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे देवगड तालुक्यातील सरपंचांनी सांगितले.

देवगड तालुक्यातील सरपंचांनी प्रशासना विरोधात नाराजीचा सूर लावला. आमदार राणे यांनी पोलीस प्रशासन व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरपंचांशी व्डिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आमदार राणे यांनी गाव पातळीवरील समस्या जाणून घेतल्या. शाळेत नेमण्यात आलेले शिक्षक त्यांच्या मूळ गावी गेले असल्याची खळबळजनक माहिती बापर्डे सरपंच संजय लाड यांनी दिली. त्यामुळे चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात येत असलेल्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. याबाबत प्रशासनाला विचारले असता अधिकारी एकमेकांवर ढकलत असल्याचे लाड यांनी सांगितले.हडपीड सरपंच दाजी राणे यांनी सांगितले की, शासनाने शाळेच्या १५ बाय १५ च्या एका खोलीत ३ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. परंतु ५० व्यक्ती गावात आल्यास काय करायचे ? याचे उत्तर नसल्याचे त्यांनी सांगितले.

या महिन्यात लहान मुलांसाठी डोस असून तो पुढील महिन्यात घेण्यात यावा. कारण कोरोनासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारीच डोस देण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे डोस पुढील महिन्यात द्यावा, अशी मागणी वैभव साळसकर यांनी केली. विश्वनाथ खानविलकर यांनी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जागा अपुरी पडणार असून शासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही, असे यावेळी सांगितले.जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणारयावेळी नीतेश राणे म्हणाले, गावपातळीवरील यंत्रणा कशी राबवायची हे सर्व निर्णय शासनाने व गावातील नागरिकांनी घ्यायचे आहेत. या यंत्रणेला आम्ही मदत करू व तुमच्या सर्व समस्यांमध्ये लक्ष घालून जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे सांगत त्यांनी सर्व सरपंचांना तशी ग्वाही दिली. तसेच उद्यापर्यंत सर्व सरपंचांना पीपीई किट देणार असल्याचेही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग