शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus : जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन,नीतेश राणे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 17:53 IST

कणकवली : सिंधुदुर्ग कोरोनामुक्त करण्यासाठी हा अ‍ॅक्शन प्लॅन असून जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी येथे ...

ठळक मुद्दे जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन, नीतेश राणे यांची माहिती१० लाख होमिओपॅथी गोळ्यांचे होणार वाटप, कणकवली तालुक्यातून सुरुवात

कणकवली : सिंधुदुर्ग कोरोनामुक्त करण्यासाठी हा अ‍ॅक्शन प्लॅन असून जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

 आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या १० लाख आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे जिल्ह्यात वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील ५ लाख गोळ्यांचे वाटप कणकवली तालुक्यातून सुरू करण्यात येणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त व्हावा हे माझे स्वप्न आहे, असे राणे म्हणाले. ओसरगांव येथील महिला भवन येथे ते बोलत होते. यावेळी वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे डॉ. श्रीराम हिर्लेकर तसेच मनीष दळवी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा आॅरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये यायला हवा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि तापसरी डोके वर काढत असते. तर हीच कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे यासाठीच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या जिल्ह्यातील प्रत्येक लहान-थोर नागरिकाला देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोळ्या तयार करताना पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाला या होमिओपॅथी गोळ्या देण्यात येणार आहेत. एकदा गोळ्यांचे वाटप केल्यानंतर एक महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्या डोसचे वाटप केले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या टीमचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

यावेळी डॉ. श्रीराम हिर्लेकर म्हणाले, केवळ कोरोनाच नव्हे तर पावसाळ्यात होणारे व्हायरल इन्फेक्शन या गोळ्यांमुळे दूर होईल. सकाळी उपाशीपोटी तीन गोळ्यांचा सलग ३ दिवस डोस घ्यावा लागेल. हे औषध घेतल्यानंतर कॉफी पिऊ नये. या डोसमुळे एक महिनाभर रोगप्रतिकारकशक्ती टिकेल.

महिन्यानंतर पुन्हा या गोळ्यांचा डोस घ्यावा. गोळ्या वाटप करताना मूळ सिंधुदुर्गवासीय, होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईन असा तीन पद्धतीने डाटा गोळा केला जाणार आहे.असा डाटा देशात प्रथमच तयार केला जात असेल. त्यामुळे आमदार नीतेश राणेंच्या या उपक्रमाची जागतिक आरोग्य संघटनेलाही दखल घ्यावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, या गोळ्या पॅकिंग कशा करतात? याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.चार केंद्रे स्थापनआयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या आपले रक्षण निश्चितच करतील. या गोळ्या तयार करताना पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर या गोळ्या तयार होत आहेत.

वेंगुर्ला, सावंतवाडी, ओसरगाव महिला भवन आणि हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गोळ्यांचे पॅकिंग सुरू आहे. प्रत्येक घरी जाऊन स्वयंसेवक या गोळ्या घरपोच करतील. तसेच संबंधित व्यक्तींची नावे नोंद करून कुटुंबप्रमुखाची सही नावांच्या यादीवर घेणार आहेत, असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग