शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : यावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:33 IST

चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले.

ठळक मुद्देयावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतचचाकरमान्यांनी जिल्ह्यात येणे टाळले : विनायक राऊत

सावंतवाडी : शिवसेना नेहमी समाजकारण करीत आली आहे. हे समाजकारणाचे व्रत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हांला मिळाले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून अशाप्रकारे लोकांप्रती आपलेपणा बाळगला जातो. याचे हे जिवंत उदाहरण आहे. चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले.शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या पुढाकारातून तालुक्यातील निराधार व दारिद्र्यरेषेखालील तब्बल दोनशे कुटुंबांची वीज बिले शिवसेनेच्यावतीने अदा करण्यात आली आहेत. ही बिले भरण्यात आली येऊन त्यांच्या पावत्यांचे वाटप खासदार राऊत यांच्या हस्ते ग्राहकांना करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, विक्रांत सावंंत, विकास कुडाळकर, रूची राऊत, भरत पंडित, महिला तालुकाप्रमुख रश्मी माळवदे, अपर्णा कोठावळे, सचिन वालावलकर, शब्बीर मणियार, महेश शिरोडकर, अशोक दळवी, विनोद काजरेकर, सुनील गावडे, अनिल जाधव, योगेश नाईक, संजय माजगावकर आदी उपस्थित होते.शैलेश परब म्हणाले, शिवसेना संघटना कायम गोरगरिबांच्या मदतीला धावत असते. शिवसेनाप्रमुखांनी ती शिकवण दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील दोनशे ग्राहकांची वीज बिले परस्पर जमा केली आहेत. लोक आर्थिक संकटात आहेत. कोरोना युद्धात शत्रू समोर दिसत नसला तरी लोक विवंचनेत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही वीज बिले भरली आहेत. शिवसेनाप्रमुखांची ८० टक्के समाजकारण ही शिकवण आहे.विक्रांत सावंत व संजय पडते यांनी शैलेश परब व रुपेश राऊळ यांच्या टीमचे कौतुक केले. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर लोक आर्थिक विवंचनेत असताना शिवसेनाप्रमुखांच्या ८० टक्के समाजकारणाचा संदेश घेऊन हे काम केले आहे, असे मी मानतो. वीजबिले भरून एक चांगला संदेश देण्यात आला आहे, असे ते म्हणाले. यावेळी दोनशे ग्राहकांना बिल भरलेल्याची पावती खासदार राऊत यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले तर आभार अनिल जाधव यांनी मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग