शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

corona virus -जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:32 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.शुक्रवारी परूळे गावचा आठवडा बाजार असतो. आठवडा बाजार शुक्रवारी ठेवू नये अशा सूचना परूळे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने व्यापाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, जमावबंदी आदेश असतानाही हा बाजार शुक्रवारी दुकाने थाटून भरविण्यात आला होता. हा बाजार भरविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी निवती पोलिसांनी जात बाजार बंद करण्याच्या सूचना केल्या.यावेळी काही व्यापारी व पोलीस यांची बाचाबाची झाली. निवती पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून यापैकी काहींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या नऊजणापैकी काहीजण स्थानिक तर काहीजण बाहेरील भाजी विक्रेते असल्याची माहिती मिळत आहे.कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहनवैभववाडी : कोरोना विषाणूच्या माध्यमातून देशावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचा विषाणू १२ तासांपेक्षा अधिक काळ रहात नाही. त्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या कर्फ्यू १०० टक्के यशस्वी केला तर कोरोनाविरूध्दची मोठी लढाई आपण जिंकू. त्यामुळे जिल्हावासीयांनी २२ मार्चला सामाजिक प्रगल्भतेचे दर्शन घडवित कर्फ्यू यशस्वी करावा, असे आवाहन डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले आहे.डॉ. पाताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हावासीयांना आवाहन केले आहे. कोरोना हे देशासमोरील मोठे संकट आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी स्वंयनिर्धार कर्फ्यूची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग