शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:32 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.शुक्रवारी परूळे गावचा आठवडा बाजार असतो. आठवडा बाजार शुक्रवारी ठेवू नये अशा सूचना परूळे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने व्यापाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, जमावबंदी आदेश असतानाही हा बाजार शुक्रवारी दुकाने थाटून भरविण्यात आला होता. हा बाजार भरविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी निवती पोलिसांनी जात बाजार बंद करण्याच्या सूचना केल्या.यावेळी काही व्यापारी व पोलीस यांची बाचाबाची झाली. निवती पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून यापैकी काहींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या नऊजणापैकी काहीजण स्थानिक तर काहीजण बाहेरील भाजी विक्रेते असल्याची माहिती मिळत आहे.कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहनवैभववाडी : कोरोना विषाणूच्या माध्यमातून देशावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचा विषाणू १२ तासांपेक्षा अधिक काळ रहात नाही. त्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या कर्फ्यू १०० टक्के यशस्वी केला तर कोरोनाविरूध्दची मोठी लढाई आपण जिंकू. त्यामुळे जिल्हावासीयांनी २२ मार्चला सामाजिक प्रगल्भतेचे दर्शन घडवित कर्फ्यू यशस्वी करावा, असे आवाहन डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले आहे.डॉ. पाताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हावासीयांना आवाहन केले आहे. कोरोना हे देशासमोरील मोठे संकट आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी स्वंयनिर्धार कर्फ्यूची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग