शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

corona virus -जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:32 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.शुक्रवारी परूळे गावचा आठवडा बाजार असतो. आठवडा बाजार शुक्रवारी ठेवू नये अशा सूचना परूळे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने व्यापाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, जमावबंदी आदेश असतानाही हा बाजार शुक्रवारी दुकाने थाटून भरविण्यात आला होता. हा बाजार भरविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी निवती पोलिसांनी जात बाजार बंद करण्याच्या सूचना केल्या.यावेळी काही व्यापारी व पोलीस यांची बाचाबाची झाली. निवती पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून यापैकी काहींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या नऊजणापैकी काहीजण स्थानिक तर काहीजण बाहेरील भाजी विक्रेते असल्याची माहिती मिळत आहे.कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहनवैभववाडी : कोरोना विषाणूच्या माध्यमातून देशावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचा विषाणू १२ तासांपेक्षा अधिक काळ रहात नाही. त्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या कर्फ्यू १०० टक्के यशस्वी केला तर कोरोनाविरूध्दची मोठी लढाई आपण जिंकू. त्यामुळे जिल्हावासीयांनी २२ मार्चला सामाजिक प्रगल्भतेचे दर्शन घडवित कर्फ्यू यशस्वी करावा, असे आवाहन डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले आहे.डॉ. पाताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हावासीयांना आवाहन केले आहे. कोरोना हे देशासमोरील मोठे संकट आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी स्वंयनिर्धार कर्फ्यूची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग