शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, आंबेरी पूल पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:12 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार गेले दोन दिवस सातत्याने सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी रात्रभर आंबेरी पूल पाण्याखाली होता. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला.

ठळक मुद्दे सिंधुदुर्गात पावसाची संततधार, आंबेरी पूल पाण्याखालीभंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहराच्या काही भागांत घुसले

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार गेले दोन दिवस सातत्याने सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर माणगाव खोऱ्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे १५ आॅगस्ट रोजी रात्रभर आंबेरी पूल पाण्याखाली होता. रविवारी दुपारी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला.चतुर्थी सण जवळ आल्यामुळे पाऊस असाच चालू राहिला तर गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही जनजीवन विस्कळीत होणार आहे. कारण माणगाव खोऱ्यातील अनेक गावे नदीवरील कॉजवेंनी जोडलेली आहेत आणि कॉजवेवर थोडाजरी पाऊस झाला तरी पाणी येऊन वाहतूक खोळंबते. गेल्यावर्षी चतुर्थी काळात लोकांचे प्रचंड हाल झाले होते. यावेळीही तसे होऊ नये अशी प्रार्थना माणगाव खोऱ्यातील जनता करीत आहे.सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कुडाळ तालुक्यातील नद्यांना मोठा पूर आल्याने कुडाळ शहरातील काही भागात भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने धोका निर्माण झाला होता. तर माणगाव खोºयातील निर्मला नदीलाही पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला. तेथील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरला होता.

शनिवारी मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली. रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. कुडाळ शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर नाका तसेच काही इतर भागापर्यंत हे पुराचे पाणी आल्याने तेथील काही घरांना धोका निर्माण झाला होता. र

विवारी सकाळच्या वेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने पुराचे पाणी वाढत होते. पुन्हा एकदा पुराचे पाणी घरापर्यंत आल्याने येथील कुटुंबीयांना मात्र नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. संततधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आला होता.बांदा आळवाडीत तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी, यावर्षी तिसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेरबांदा परिसरात शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रविवारी सकाळी तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडीतील घुसले. काही भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला.काही दुकानात सकाळीच तेरेखोल नदीचे पाणी घुसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ग्रामपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने आळवाडी येथे व्यापाऱ्याना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.गतवर्षीप्रमाणे संपूर्ण बांदा शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी तीनदा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन मच्छी मार्केट व बाजूच्या दुकानात घुसले.स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदतकार्य केले. बांदा शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट रस्ता रविवार सकाळपासून पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग