शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

उद्योगधंद्यांच्या ‘हब’ची होणार निर्मिती : राजापूर होईल महानगरी--रिफायनरी एक सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:37 IST

हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी

ठळक मुद्देघरबसल्या मिळेल रोजगार- कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमात भाग घेणे आवश्यक

महेश सरनाईक ।सिंधुदुर्ग : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. याचा वापर करून विविध साहित्य तयार केले जाते. यात विमानाच्या पार्टपासून अगदी प्लास्टिक पिशव्यांपर्यंतचा समावेश होतो.

रिफायनरी प्रकल्पाअंतर्गत पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या निर्मितीनंतर यातील ४५ टक्के आयात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या कितीतरी पटीने जास्त उत्पादन राजापूर रिफायनरी प्रकल्पामध्ये होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून उद्योगधंद्यांचा हब निर्माण होणार असून यातून अनेक नवनवीन उद्योग निर्माण होतील.

नाणार येथील रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्प १६ हजार एकर परिसरात होणार आहे. यात ३0 ते ३५ टक्के जमीन असून ३४ हजार एकरावर ग्रीन बेल्ट (वनसंपत्ती) आहे. प्रकल्पबाधीत क्षेत्रात कलमांची आणि रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३0 टक्के जमिनीवर झाडे लावल्याशिवाय सरकार किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकल्पाला मंजुरीच देऊ शकत नाही. तशी तरतूद करारनाम्यात करण्यात आली आहे.

आता प्रकल्प होत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात येणाºया जमिनीतील ७३ टक्के जमीन ओसाड आहे. यात पाळेकरवाडी आणि चौके ही दोन गावे पूर्णपणे प्रकल्पबाधित आहेत. तर अन्य १२ गावे हे निम्मी बाहेर आणि निम्मी आत आहेत. तर प्रकल्पाला लागून दोन गावे ही इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. त्यात कुंभवडे व वाडापालये यांचा समावेश आहे. आता या प्रकल्पात राजापूर तालुक्यातील १४ गावे आणि सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दोन गावे ही प्रकल्पबाधित असल्याने या पूर्ण भागात शहरीकरण वाढेल.कोकणात होईल घरवापसीसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सोडल्या तर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. परिणामी येथील घराघरातील सुशिक्षित व्यवसाय, उद्योगासाठी किंवा नोकरीसाठी पुणे, मुंंबई, कोल्हापूर, गोवा महानगरांची वाट धरतात. त्यामुळे कोकणातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे दरवर्षी स्थलांतर होत असते. नाणार येथील रिफायनरी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता व्यवसायासाठी, नोकरी धंद्यासाठी वणवण भटकणाºया सर्वांची या निमित्ताने कोकणात कायमस्वरूपी ‘घरवापसी’ होण्यास मदत होणार आहे.आंबा, काजू, मच्छिमारीसाठी मोठी बाजारपेठ !रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार येथे मोठ्या बाजारपेठा निर्माण होतील. मच्छिमार, आंबा बागायतदारांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होईल. सध्या या भागात मोठ्या बाजारपेठा नसल्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढत आहे. वाहतूक खर्चामुळे उत्पादन बाजारपेठेत नेईपर्यंत त्याचा दर गगनाला भिडणारा होत आहे. परिणामी ज्यावेळी येथील आंबा, काजू, नारळ व इतर पिकांना या भागातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च पूर्णपणे वाचेल आणि परिणामी नफ्यातही वाढ होईल.(पुढील भागात रिफायनरीतून प्रदूषण यात तारतम्यच नाही)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण