शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उद्योगधंद्यांच्या ‘हब’ची होणार निर्मिती : राजापूर होईल महानगरी--रिफायनरी एक सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:37 IST

हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी

ठळक मुद्देघरबसल्या मिळेल रोजगार- कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमात भाग घेणे आवश्यक

महेश सरनाईक ।सिंधुदुर्ग : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. याचा वापर करून विविध साहित्य तयार केले जाते. यात विमानाच्या पार्टपासून अगदी प्लास्टिक पिशव्यांपर्यंतचा समावेश होतो.

रिफायनरी प्रकल्पाअंतर्गत पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या निर्मितीनंतर यातील ४५ टक्के आयात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या कितीतरी पटीने जास्त उत्पादन राजापूर रिफायनरी प्रकल्पामध्ये होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून उद्योगधंद्यांचा हब निर्माण होणार असून यातून अनेक नवनवीन उद्योग निर्माण होतील.

नाणार येथील रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्प १६ हजार एकर परिसरात होणार आहे. यात ३0 ते ३५ टक्के जमीन असून ३४ हजार एकरावर ग्रीन बेल्ट (वनसंपत्ती) आहे. प्रकल्पबाधीत क्षेत्रात कलमांची आणि रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३0 टक्के जमिनीवर झाडे लावल्याशिवाय सरकार किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकल्पाला मंजुरीच देऊ शकत नाही. तशी तरतूद करारनाम्यात करण्यात आली आहे.

आता प्रकल्प होत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात येणाºया जमिनीतील ७३ टक्के जमीन ओसाड आहे. यात पाळेकरवाडी आणि चौके ही दोन गावे पूर्णपणे प्रकल्पबाधित आहेत. तर अन्य १२ गावे हे निम्मी बाहेर आणि निम्मी आत आहेत. तर प्रकल्पाला लागून दोन गावे ही इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. त्यात कुंभवडे व वाडापालये यांचा समावेश आहे. आता या प्रकल्पात राजापूर तालुक्यातील १४ गावे आणि सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दोन गावे ही प्रकल्पबाधित असल्याने या पूर्ण भागात शहरीकरण वाढेल.कोकणात होईल घरवापसीसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सोडल्या तर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. परिणामी येथील घराघरातील सुशिक्षित व्यवसाय, उद्योगासाठी किंवा नोकरीसाठी पुणे, मुंंबई, कोल्हापूर, गोवा महानगरांची वाट धरतात. त्यामुळे कोकणातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे दरवर्षी स्थलांतर होत असते. नाणार येथील रिफायनरी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता व्यवसायासाठी, नोकरी धंद्यासाठी वणवण भटकणाºया सर्वांची या निमित्ताने कोकणात कायमस्वरूपी ‘घरवापसी’ होण्यास मदत होणार आहे.आंबा, काजू, मच्छिमारीसाठी मोठी बाजारपेठ !रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार येथे मोठ्या बाजारपेठा निर्माण होतील. मच्छिमार, आंबा बागायतदारांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होईल. सध्या या भागात मोठ्या बाजारपेठा नसल्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढत आहे. वाहतूक खर्चामुळे उत्पादन बाजारपेठेत नेईपर्यंत त्याचा दर गगनाला भिडणारा होत आहे. परिणामी ज्यावेळी येथील आंबा, काजू, नारळ व इतर पिकांना या भागातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च पूर्णपणे वाचेल आणि परिणामी नफ्यातही वाढ होईल.(पुढील भागात रिफायनरीतून प्रदूषण यात तारतम्यच नाही)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण