शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगधंद्यांच्या ‘हब’ची होणार निर्मिती : राजापूर होईल महानगरी--रिफायनरी एक सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:37 IST

हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी

ठळक मुद्देघरबसल्या मिळेल रोजगार- कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमात भाग घेणे आवश्यक

महेश सरनाईक ।सिंधुदुर्ग : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. याचा वापर करून विविध साहित्य तयार केले जाते. यात विमानाच्या पार्टपासून अगदी प्लास्टिक पिशव्यांपर्यंतचा समावेश होतो.

रिफायनरी प्रकल्पाअंतर्गत पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या निर्मितीनंतर यातील ४५ टक्के आयात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या कितीतरी पटीने जास्त उत्पादन राजापूर रिफायनरी प्रकल्पामध्ये होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून उद्योगधंद्यांचा हब निर्माण होणार असून यातून अनेक नवनवीन उद्योग निर्माण होतील.

नाणार येथील रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्प १६ हजार एकर परिसरात होणार आहे. यात ३0 ते ३५ टक्के जमीन असून ३४ हजार एकरावर ग्रीन बेल्ट (वनसंपत्ती) आहे. प्रकल्पबाधीत क्षेत्रात कलमांची आणि रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३0 टक्के जमिनीवर झाडे लावल्याशिवाय सरकार किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकल्पाला मंजुरीच देऊ शकत नाही. तशी तरतूद करारनाम्यात करण्यात आली आहे.

आता प्रकल्प होत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात येणाºया जमिनीतील ७३ टक्के जमीन ओसाड आहे. यात पाळेकरवाडी आणि चौके ही दोन गावे पूर्णपणे प्रकल्पबाधित आहेत. तर अन्य १२ गावे हे निम्मी बाहेर आणि निम्मी आत आहेत. तर प्रकल्पाला लागून दोन गावे ही इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. त्यात कुंभवडे व वाडापालये यांचा समावेश आहे. आता या प्रकल्पात राजापूर तालुक्यातील १४ गावे आणि सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दोन गावे ही प्रकल्पबाधित असल्याने या पूर्ण भागात शहरीकरण वाढेल.कोकणात होईल घरवापसीसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सोडल्या तर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. परिणामी येथील घराघरातील सुशिक्षित व्यवसाय, उद्योगासाठी किंवा नोकरीसाठी पुणे, मुंंबई, कोल्हापूर, गोवा महानगरांची वाट धरतात. त्यामुळे कोकणातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे दरवर्षी स्थलांतर होत असते. नाणार येथील रिफायनरी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता व्यवसायासाठी, नोकरी धंद्यासाठी वणवण भटकणाºया सर्वांची या निमित्ताने कोकणात कायमस्वरूपी ‘घरवापसी’ होण्यास मदत होणार आहे.आंबा, काजू, मच्छिमारीसाठी मोठी बाजारपेठ !रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार येथे मोठ्या बाजारपेठा निर्माण होतील. मच्छिमार, आंबा बागायतदारांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होईल. सध्या या भागात मोठ्या बाजारपेठा नसल्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढत आहे. वाहतूक खर्चामुळे उत्पादन बाजारपेठेत नेईपर्यंत त्याचा दर गगनाला भिडणारा होत आहे. परिणामी ज्यावेळी येथील आंबा, काजू, नारळ व इतर पिकांना या भागातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च पूर्णपणे वाचेल आणि परिणामी नफ्यातही वाढ होईल.(पुढील भागात रिफायनरीतून प्रदूषण यात तारतम्यच नाही)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण