शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 15:44 IST

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत?'

कणकवली : बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आवाज उठविला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीत उद्या, गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.कणकवली येथील काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्ष संजय राणे, आयेशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत, प्रदीपकुमार जाधव, नीलेश मालंडकर, डॉ.प्रमोद घाडीगावकर, बाबा काझी आदी उपस्थित होते.शेख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये शेवटच्या टप्प्यात लाखोंनी मते वाढली आहेत. तर लोकसभा व विधानसभेच्या मतदानात मोठी तफावत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने त्याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांनी  याला उत्तर देताना मात्र अनेक मुद्यांना बगल दिली आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत? निवडणूक आयोगाने त्यांना प्रवक्ते नेमले आहे का? याचे उत्तर आधी भाजपने जनतेला द्यावे.याबाबत जनजागृती होण्यासाठी कणकवली शहरातून उद्या, गुरुवारी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता बसस्थानकालगतच्या बौद्धविहार येथून या रॅलीला सुरूवात होईल. तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली निघणार आहे. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केले.