शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 15:44 IST

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत?'

कणकवली : बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आवाज उठविला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीत उद्या, गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.कणकवली येथील काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्ष संजय राणे, आयेशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत, प्रदीपकुमार जाधव, नीलेश मालंडकर, डॉ.प्रमोद घाडीगावकर, बाबा काझी आदी उपस्थित होते.शेख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये शेवटच्या टप्प्यात लाखोंनी मते वाढली आहेत. तर लोकसभा व विधानसभेच्या मतदानात मोठी तफावत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने त्याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांनी  याला उत्तर देताना मात्र अनेक मुद्यांना बगल दिली आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत? निवडणूक आयोगाने त्यांना प्रवक्ते नेमले आहे का? याचे उत्तर आधी भाजपने जनतेला द्यावे.याबाबत जनजागृती होण्यासाठी कणकवली शहरातून उद्या, गुरुवारी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता बसस्थानकालगतच्या बौद्धविहार येथून या रॅलीला सुरूवात होईल. तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली निघणार आहे. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केले.