शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस'च्यावतीने कणकवलीत उद्या मशाल रॅलीचे आयोजन

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 15:44 IST

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत?'

कणकवली : बोगस मतांच्या पाठबळावर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आवाज उठविला आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवलीत उद्या, गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.कणकवली येथील काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूणकर, तालुका उपाध्यक्ष संजय राणे, आयेशा सय्यद, जिल्हा सचिव विजय सावंत, प्रदीपकुमार जाधव, नीलेश मालंडकर, डॉ.प्रमोद घाडीगावकर, बाबा काझी आदी उपस्थित होते.शेख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये शेवटच्या टप्प्यात लाखोंनी मते वाढली आहेत. तर लोकसभा व विधानसभेच्या मतदानात मोठी तफावत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने त्याबाबत अद्यापही माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही नेत्यांनी  याला उत्तर देताना मात्र अनेक मुद्यांना बगल दिली आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असताना भाजप नेते का उत्तर देत आहेत? निवडणूक आयोगाने त्यांना प्रवक्ते नेमले आहे का? याचे उत्तर आधी भाजपने जनतेला द्यावे.याबाबत जनजागृती होण्यासाठी कणकवली शहरातून उद्या, गुरुवारी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता बसस्थानकालगतच्या बौद्धविहार येथून या रॅलीला सुरूवात होईल. तेथून अप्पासाहेब पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही रॅली निघणार आहे. संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शेख यांनी केले.