शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जिल्ह्यातील काँग्रेस नेते 'मंबाजीबुवा'

By admin | Updated: June 30, 2016 23:55 IST

विनायक राऊत : शिवबंधन पंधरवड्याचा शुभारंभ; जेष्ठांचा सत्कार; काँग्रेसवर टीका

वैभववाडी: काँग्रेसच्या राजवटीत ठेकेदार व पुढा-यांनी पोटं भरली. जिल्ह्यातील काँग्रेस म्हणजे 'मंबाजीबुवा' असून विकास पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे नाही, केवळ रक्तरंजित राजकारण म्हणजे विकास नव्हे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी शिवबंधन पंधरवड्यानिमित्त कोकिसरेतील मेळाव्यात केली.शिवसेना पक्ष स्थापनेच्या पन्नाशीनिमित्त जिल्हा शिवसेनेतर्फे शिवबंधन पंधरवडा साजरा केला जात असून त्याचा प्रारंभ गुरूवारी जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोरे येथे झाला. त्यानंतर कोकिसरे येथील विभागीय मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, सिध्दीविनियक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, युवासेना जिल्हा प्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, नियोजन समिती सदस्य प्रकाश परब, तालुका संपर्क प्रमुख विठ्ठल बंड, कणकवली संपर्क प्रमुख शंकर पार्सेकर, तालुका प्रमुख अशोक रावराणे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, राजेंद्र राऊत, पंढरीनाथ तावडे, नंदू शिंदे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, श्रीराम शिंगरे आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी भगवा हातात घेतला तो मतांसाठी नव्हे तर हिंदुस्थानच्या रक्षणासाठी! त्यामुळेच ५० वर्षे शिवसेना सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. आम्ही म्हणू तोच विकास ही संकल्पना नारायण राणे यांनी जिल्ह्यात राबवली. परंतु, जिल्हावासियांना हवा तो विकास पालकमंत्री दीपक केसरकर करीत आहेत. राणेंना २५ वर्षाच्या कालखंडात जो सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला विकास जमला नाही. तो पालकमंत्री म्हणून केसरकरांनी दीड वर्षात करुन दाखविला आहे. ते म्हणाले , दीपक केसरकर पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय खून बंद झाले. राजकीय ठेकेदारीला लगाम लागला. भ्रष्टाचार कमी झाला. नापणे धबधब्याच्या माध्यमातून पंचक्रोशीचा विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच स्वदेस पर्यटन योजनेसाठी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हाची निवड झाली आहे. जिल्ह्यातील वीजेचे प्रश्न पुढच्या तीन महिन्यात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा डौलाने फडकविण्यासाठी जेष्ठांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे.आमदार नाईक म्हणाले, सिंधुदुर्गात शिवसेना रुजविणा-या वैभववाडीच्या चहूबाजूंना शिवसेनेचे आमदार असताना येथे मात्र, काँग्रेसचा आमदार ही शिवसैनिकांच्या मनातील खंत आहे. यावेळी कोकिसरे विभागातील ५० जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.हे बंधन आहे; जोखड नव्हे !वैभववाडी तालुका आणि जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आहे. जिल्ह्याचे सभापतिपद वैभववाडीत आहे. तरीही विकास होत नसेल तर भाकरी परतण्याची वेळ झाली आहे. हे जनतेने लक्षात घ्यावे. आम्ही बांधतोय हे शिव'बंधन' आहे. जोखड नव्हे! त्यामुळे आदराने बांधून घ्या. त्याचप्रमाणे आगामी काळातील परिवर्तनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तथा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांनी केले.