शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

प्रकल्पग्रस्तांची घरकुले पूर्ण करा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:43 IST

Pradhan Mantri Awas Yojana,UdaySamant, Ratnagiri आवास दिन म्हणजे केवळ इंदिरा आवास, प्रधानमंत्री आवास एवढ्यापुरतेच मर्यादित नसून जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचीही घरकुले पूर्ण झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती पूर्ण झाली तरच खऱ्या अर्थाने आवासदिन साजरा केल्याचे समाधान मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांची घरकुले पूर्ण करा : उदय सामंतजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत महाआवास अभियान

सिंधुदुर्ग : घरकुल आवास योजनेत ८२ टक्के काम पूर्ण करीत राज्यात पहिला क्रमांक पटकावला याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन. मात्र, पुढील शंभर दिवसांच्या अभियान कालावधीत १०० टक्के काम करून जिल्ह्यातील बेघरांना घरकुल देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करूया.

आवास दिन म्हणजे केवळ इंदिरा आवास, प्रधानमंत्री आवास एवढ्यापुरतेच मर्यादित नसून जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचीही घरकुले पूर्ण झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती पूर्ण झाली तरच खऱ्या अर्थाने आवासदिन साजरा केल्याचे समाधान मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हास्तरीय महाआवास अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठीची कार्यशाळा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक तथा ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील तसेच विविध खात्यांचे अधिकारी, पंचायत समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.यावेळी उदय सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही २८६ लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी जागा उपलब्ध नाही. या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी खास सभा घेऊन सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना या सभेमध्ये बोलवावे आणि हा जागेचा प्रश्न ज्या ठिकाणी शासकीय जागा असेल अशा ठिकाणी जागा देऊन सोडवावा. तसे नियोजन करावे.याचबरोबर जिल्ह्यात प्रकल्प हवेत यासाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी आपल्या जागा दिल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना अद्यापही घरकुले देता आलेली नाहीत. अशांची यादी काढावी आणि त्यांची घरे पूर्ण करावीत.घरकुल आवास योजनेत सिंधुदुर्ग राज्यात पहिलाप्रभारी प्रकल्प संचालक दीपाली पाटील म्हणाल्या, जिल्ह्याने घरकुल आवास योजनेमध्ये ८१ टक्के गुण मिळवित महाराष्ट्रात नंबर एक मिळविला आहे. तर देशात जिल्ह्याचा ९२ वा क्रमांक आहे. जिल्ह्यात बेघर असलेल्या व्यक्तींपैकी एकूण २९७ व्यक्तींना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या जमिनी नव्हत्या. यापैकी देवगडमधील अकरा जणांना जमिनी देऊन त्यांचे घरकुल उभारण्यात यश आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत २८६ लाभार्थी जमीन नसल्याने घरकुलापासून वंचित आहेत. सन २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी जिल्ह्यासाठी ४ हजार ९४७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी ३ हजार १४३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर १८०४ घरकुलांना मंजुरी देणे बाकी आहे. यावर्षीसाठी एकूण १५४७ नवीन घरकुलांचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यातील बेघर लोकांना घरकुले मिळावीत यासाठी जमीन खरेदीसाठी मिळणारी रक्कम ही फार तुटपुंजी आहे आणि सिंधुदुर्गातील जमिनींचे दर खूप जास्त आहेत. त्यामुळे जमीन खरेदी करण्यासाठी मिळणारा निधी वाढवून मिळावा.- डॉ. हेमंत वसेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील कातकरी आदिवासी समाज बांधवांकडे अद्यापही जातीचे दाखले नाहीत. अशा व्यक्तींना खास कॅम्प घेऊन त्यांना जातीचे दाखले मिळतील यासाठीची रचना करा. जेणेकरून त्यांना घरकुले देताना येणारी जागेची अडचण दूर होईल- मंगेश जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाRatnagiriरत्नागिरी