शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

करूळ धनगरवाडीच्या समस्या ग्रामविकासमंत्र्यांच्या दरबारी, नितेश राणेंचे निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 22:22 IST

वैभववाडी : करुळ धनगरवाडी ही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वैभववाडी : करूळ धनगरवाडी ही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या वाडीला त्वरित सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे आमदार नितेश राणे यांनी केली.हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथील विधानभवनात आमदार राणे यांनी ग्रामविकासमंत्री मुंडे-पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करूळ धनगरवाडी मागील ६० वर्षांपासून रस्ता, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. या सुविधांची तेथील ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी केलेली असताना त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळेच दुर्गम, डोंगराळ भागातील गोरगरीब जनतेला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.करुळ धनगरवाडीकडे जाणा-या सुमारे ३ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, रस्त्यातील ३ छोटे पूल बांधणे व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय करणे ही कामे आवश्यक आहेत. त्यामुळे या सुविधा विनाविलंब पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिका-यांना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे