शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी समिती  - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 10:12 PM

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे ...

 सावंतवाडी - सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी आंबोलीसाठी स्वतंत्र असे टुरिझम पोलीस ठाणे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाने मागविला आहे, असेही  त्यांनी स्पष्ट केले.मंत्री दीपक केसरकर हे रविवारी शासकीय बैठकीसाठी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आरोग्य अधिकारी योगेश साळे, तहसीलदार सतीश कदम, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सांगली येथील घटनेनंतर शासन पोलीस कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत आहेत. त्यासाठी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची एक बैठक झाली. या बैठकीत पुढील पंधरा दिवसात कस्टडीतील मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याबाबत आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर शासन त्यांच्यावर उचित असा निर्णय घेईल, असे मंत्री केसरकर म्हणाले. तसेच अहमदनगर घटनेबाबतही एखाद्या शेतकºयावर गोळीबार करणे चुकीचे आहे. पण अशी आंदोलने होत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी बैठक घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे. गोळीबारापर्यंत विषय येऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.आंबोली येथील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची दखल घेत आम्ही आंबोलीत आणखी एक तपासणी नाका लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे हा नाका लावण्यात आला आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आली आहे. मात्र एवढ्यावरच शासन थांबणार नाही, तर माथेरान तसेच अन्य पर्यटन स्थळांवर ज्या प्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत, तसे पोलीस ठाणे आंबोलीत निर्माण करण्यात येणार आहे. हे पोलीस ठाणे पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना आंबोलीत रूजविण्यात येईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मागविण्यात आला आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल व लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊ, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर येथील महिला पोलिस अधिकारी गेले दीड वर्ष बेपत्ता आहे. त्याबाबत माझ्याकडे रितसर तक्रार आली तर त्यावर अधिक भाष्य करेन, असे सांगत याची मी स्वत: माहितीही घेईन आणि यात काय करता येईल हे तपासून बघितले जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार