शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : वेंगुर्ले नगरपरिषद देशात अठरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:54 IST

राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे.

वेंगुर्ले : राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे. कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा तर मालवण नगरपरिषदेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. याबाबतची घोषणा शनिवारी जाहीर झाली असून केंद्र सरकारने देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे झोन तयार केले होते.यात मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दमण-दिव या राज्यांचा समावेश होता. त्यातून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे.२०१७-१८ मध्ये भारत सरकारच्या स्वच्छता विभागाने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते. हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान वेगवेगळ््या नगरपालिका क्षेत्रात घेण्यात आले होते. यात देशातून १४२२ नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. यातून देशातील पहिल्या वीस नगरपालिकांना खास बक्षीस देण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्र सरकारचे प्रतिनिधी येऊन करीत असत. तर विभागीय स्तरावरून मार्गदर्शन केले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण या नगरपालिकांनी सहभाग घेतला होता.स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेगवेगळे मुद्दे देण्यात आले होते. यात प्रशासकीय कामकाज, लोकांची मते, स्वच्छतेबाबतची जागरूकता आदी मुद्दे यात घेण्यात आले होते. त्यांना गुण देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात येऊन नागरिकांशी थेट चर्चा केली. हे प्रतिनिधी नगरपालिका क्षेत्रात दोन दिवस थांबले होते. त्यांनी कचºयाचे व्यवस्थापन तसेच पालिका राबवित असलेले प्रकल्प आदींची पाहणी केली होती व त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता.केंद्र सरकारच्या विविध प्रतिनिधींकडून आलेल्या अहवालांनंतर त्यांचे गुणांकन करून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सर्व क्रमांक केंद्र सरकारने वेबसाईटवर टाकले आहेत. यात देशात स्वच्छतेत महाराष्ट्र सरकारचा दुसरा क्रमांक आला आहे. तर स्वच्छतेत देशात महाराष्ट्रातून पाचगणी ही नगरपालिका पहिली आली आहे.दरम्यान, सन २०१५ ते २०१८ या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ शहर पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार २०१७ व २०१६, फाईव्ह लिव्हज् राष्ट्रीय सन्मान २०१८, कोकण विभागात प्रथम, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट नगरपालिका, हागणदारीमुक्त शहर पुरस्कार असे पुरस्कार मिळविले आहेत. हे सर्व यश नागरिक, स्वच्छता कर्मचारी व दूत, आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.तर सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केले असून, वेंगुर्ले व कणकवली नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे खास अभिनंदन केले आहे.केंद्र सरकारकडून खास गौरवपहिल्या वीस नगरपालिकांमध्ये येण्याचा मान वेंगुर्ले नगरपालिकेने पटकावला असून या नगरपालिकेचा केंद्र सरकारच्यावतीने खास गौरव करण्यात येणार आहे. तर कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा  तर मालवण नगरपालिकेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. हे क्रमांक १४२२ नगरपालिकेतून निवडण्यात आले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग