शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : वेंगुर्ले नगरपरिषद देशात अठरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:54 IST

राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे.

वेंगुर्ले : राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पाचगणी नगरपरिषदेने पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तर पहिल्या वीस नगरपालिकांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने देशात अठरावा क्रमांक मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे. कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा तर मालवण नगरपरिषदेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. याबाबतची घोषणा शनिवारी जाहीर झाली असून केंद्र सरकारने देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे झोन तयार केले होते.यात मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दमण-दिव या राज्यांचा समावेश होता. त्यातून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे.२०१७-१८ मध्ये भारत सरकारच्या स्वच्छता विभागाने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते. हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान वेगवेगळ््या नगरपालिका क्षेत्रात घेण्यात आले होते. यात देशातून १४२२ नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. यातून देशातील पहिल्या वीस नगरपालिकांना खास बक्षीस देण्यात येणार आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्र सरकारचे प्रतिनिधी येऊन करीत असत. तर विभागीय स्तरावरून मार्गदर्शन केले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण या नगरपालिकांनी सहभाग घेतला होता.स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेगवेगळे मुद्दे देण्यात आले होते. यात प्रशासकीय कामकाज, लोकांची मते, स्वच्छतेबाबतची जागरूकता आदी मुद्दे यात घेण्यात आले होते. त्यांना गुण देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात येऊन नागरिकांशी थेट चर्चा केली. हे प्रतिनिधी नगरपालिका क्षेत्रात दोन दिवस थांबले होते. त्यांनी कचºयाचे व्यवस्थापन तसेच पालिका राबवित असलेले प्रकल्प आदींची पाहणी केली होती व त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता.केंद्र सरकारच्या विविध प्रतिनिधींकडून आलेल्या अहवालांनंतर त्यांचे गुणांकन करून हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. सर्व क्रमांक केंद्र सरकारने वेबसाईटवर टाकले आहेत. यात देशात स्वच्छतेत महाराष्ट्र सरकारचा दुसरा क्रमांक आला आहे. तर स्वच्छतेत देशात महाराष्ट्रातून पाचगणी ही नगरपालिका पहिली आली आहे.दरम्यान, सन २०१५ ते २०१८ या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ शहर पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार २०१७ व २०१६, फाईव्ह लिव्हज् राष्ट्रीय सन्मान २०१८, कोकण विभागात प्रथम, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट नगरपालिका, हागणदारीमुक्त शहर पुरस्कार असे पुरस्कार मिळविले आहेत. हे सर्व यश नागरिक, स्वच्छता कर्मचारी व दूत, आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.तर सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केले असून, वेंगुर्ले व कणकवली नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे खास अभिनंदन केले आहे.केंद्र सरकारकडून खास गौरवपहिल्या वीस नगरपालिकांमध्ये येण्याचा मान वेंगुर्ले नगरपालिकेने पटकावला असून या नगरपालिकेचा केंद्र सरकारच्यावतीने खास गौरव करण्यात येणार आहे. तर कणकवली नगरपंचायतीने ३६ वा, सावंतवाडी नगरपालिकेने ६४ वा  तर मालवण नगरपालिकेने ७८ वा क्रमांक पटकावला आहे. हे क्रमांक १४२२ नगरपालिकेतून निवडण्यात आले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग