शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:33 IST

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणारआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग : कोकणातील एका जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.कोकणातील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबरोबरच राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र लवकरच सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांची 2 मे रोजी तातडीने भेट घेऊन लक्ष वेधले होते.

तसेच कोकणात केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात केंद्र सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर केल्या जात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या अडचणी दूर न झाल्यामुळे अखेर रत्नागिरीत केंद्र सुरू केले जाणार आहे.रत्नागिरीबरोबरच राज्यातील 11 ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पीटलच्या सहकार्याने केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नात ही माहिती देण्यात आली.कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र नसल्यामुळे कर्करोग रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा बराच वेळ व पैसाही नाहक खर्च होतो.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्ण साधारणतः चार तासांत मुंबईला पोचू शकतात. मात्र, कोकणातील रुग्णांना किमान सहा ते 13 तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोकणातील एका जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली होती.

टॅग्स :Healthआरोग्यNiranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी