शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:33 IST

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू होणारआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग : कोकणातील एका जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे.कोकणातील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबरोबरच राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र लवकरच सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांची 2 मे रोजी तातडीने भेट घेऊन लक्ष वेधले होते.

तसेच कोकणात केंद्र सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात केंद्र सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर केल्या जात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या अडचणी दूर न झाल्यामुळे अखेर रत्नागिरीत केंद्र सुरू केले जाणार आहे.रत्नागिरीबरोबरच राज्यातील 11 ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पीटलच्या सहकार्याने केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नात ही माहिती देण्यात आली.कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र नसल्यामुळे कर्करोग रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा बराच वेळ व पैसाही नाहक खर्च होतो.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्ण साधारणतः चार तासांत मुंबईला पोचू शकतात. मात्र, कोकणातील रुग्णांना किमान सहा ते 13 तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोकणातील एका जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार डावखरे यांनी केली होती.

टॅग्स :Healthआरोग्यNiranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी