शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sindhudurg- बांदा येथील तपासणी नाका उद्यापासून सुरू होणार, बेकायदा वाहतुकीला चाप बसणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 31, 2023 12:46 IST

वाहनांचे पूर्ण स्कॅनिंग होणार 

बांदा (सिंधुदुर्ग) : तब्बल १५ वर्षे वादाच्या भोव-यात सापडलेला बांदा येथील सीमा तपासणी नाका अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरटीओ व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे नाके या ठिकाणी सुरू होणार आहेत. त्यानंतर अन्य नाकी सुरू होणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्तांनी काढले आहे.याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाची नुकतीच बैठक घेऊन नाका सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. हा अत्याधुनिक सीमा तपासणी नाका असल्याने या नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या वाहनांना आता तपासणी करूनच राज्यात प्रवेश मिळणार आहे. गेली १५ वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा सीमा तपासणी नाका आता सुरु होणार असल्याने बेकायदा व ओव्हरलोड वाहतुकीला चाप बसणार आहे. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता. सुरुवातीला गणेश चतुर्थी कालावधीत तपासणी नाका सुरु कारण्याच्या हालचाली होत्या. मात्र त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. तपासणी नाका सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर व कालावधी कमी असल्याने येथील सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात आली होती. हा अत्याधुनिक तपासणी नाका असल्याने याठिकाणी प्रशासकीय तांत्रिक बाबींबरोबरच प्रवाशांना देखील सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. राज्यात सीमेवर ठिकठिकाणी २२ तपासणी नाके राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सीमेवर ठिकठिकाणी अत्याधुनिक २२ तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्याचा देखील समावेश आहे. मंजुरी मिळाल्यानंतर २००७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. मात्र तपासणी नाक्यासाठी ३२ एकर क्षेत्र संपादित करण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी प्रचंड विरोध करत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शासनाने बळाचा वापर करत पोलीस बंदोबस्तात भुसंपादन व सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली होती.

नाक्याच्या विरोधात हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तपासणी नाक्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. न्यायालयीन मार्ग मोकळा झाल्याने हा तपासणी सुरु करण्याबाबत राज्य शासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या. ठेकेदार कंपनीला लवकरात लवकर नाका सुरु करण्यासाठी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

२४ तास सेवा मात्र मागील वर्षात ३ वेळा मुहूर्त साधूनही तपासणी नाका सुरु न झाल्याने नाका सुरु होण्याबाबत साशंकता होती. या नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलीस, वनविभाग, उत्पादन शुल्क, महसूल, दहशतवाद विरोधी पथक तसेच अमली पदार्थ विरोधी पथक अशा सात विभागाचे कर्मचारी २४ तास सेवा बजाविणार आहेत. वाहनांचे पूर्ण स्कॅनिंग होणार हा अत्याधुनिक तपासणी नाका असून या नाक्यावरून प्रवास करणारे वाहन हे डिजिटल स्कॅनिंग होऊन बाहेर पडणार आहे. यामुळे दारू वाहतूक, अमली पदार्थ वाहतूक याची तात्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे. महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही मार्गांवर नाका उभारण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी संकुल उभारण्यात आले आहे. याठिकाणी सात विभागाचे कार्यालय होणार असल्याने प्रत्येक इमारतीला खात्यानुसार नावे देखील देण्यात आली आहेत. महामार्गावर इन्सुली खामदेव नाका तर गोव्यातून प्रवेश करताना पत्रादेवी येथून पुढे तपासणी नाका आहे. याठिकाणी वाहनाकडून कोणताही टोल आकरण्यात येणार नाही. व्यावसायिक व मालवाहक वाहनांकडून टोल मात्र व्यावसायिक व माल वाहक वाहनांकडून मालाच्या वजनानुसार टोल आकारण्यात येणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेसात मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ४७ रुपये २० पैसे, मध्यम व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेबारा मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ९४ रुपये ४० पैसे, जड व अतिजड व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन १२ मेट्रिक टनच्या पुढे असेल त्यांच्याकडून १८८ रुपये ८० पैसे टोल आकारण्यात येणार आहे. यातून कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या तसेच शासनाच्या संरक्षण विभागाची वाहने यांना सवलत देण्यात आली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग