शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांनी सावंतवाडीत दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल, म्हणाले आज फक्त माझाच अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 21:41 IST

महाराष्ट्रात नेहमी पत्रकारांशी खुल्या दिलाने संवाद साधणारे राज्याचे बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क आता पत्रकारांच्या प्रश्नांना फुल्ली मारल्याचे दिसून येत आहे.

सावंतवाडी - महाराष्ट्रात नेहमी पत्रकारांशी खुल्या दिलाने संवाद साधणारे राज्याचे बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क आता पत्रकारांच्या प्रश्नांना फुल्ली मारल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सावंतवाडी येथे आलेल्या मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधणे टाळले. मात्र पत्रकारांनी आग्रह करताच माझा अजेंडा असेल तर बोलेन, तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणार नाही, असे म्हणत बांधकाम अधिका-यांशी झालेल्या बैठकीची माहिती देत काढता पाय घेतला.महाराष्ट्राचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण राज्यात फिरत आहेत. तसे ते शुक्रवारी सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी सावंतवाडीतील निर्माण भवन येथे बांधकामच्या सर्व अधिका-यांशी बैठक घेत भविष्यात कशा प्रकारे कामाचे नियोजन करावे लागेल यांचा सक्षिप्त आढावा घेतला.त्यानंतर ते बैठक आटोपून बांदा येथे निघत असतानाच पत्रकारांशी संवाद साधावा असा आग्रह धरला असता मंत्री पाटील यांनी नकार दिला. तरीही त्यांनी मी तुमच्याशी संवाद साधतो, पण माझा अजेंडा असेल, तुमचा अजेंडा मला चालणार नाही, असे सांगत बोलण्यास सुरूवात केली. एरव्ही मंत्री चंद्रकांत पाटील पत्रकारांच्या गळ््यातील ताईत मानले जायचे, पण अलीकडच्या काळात मंत्री पाटील यांनी पत्रकारांकडे पाठ फिरविली आहे.मध्यंतरी काँग्रेस नेते नारायण राणे यांना भाजपमध्ये आणण्याचा विषय असो अगर कोल्हापूरातून महाराष्ट्राचे राजकारण चालत असल्याचा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आरोप यामुळे मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलून वाद वाढवून घेणे टाळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच सावंतवाडीत येऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळत निघून गेले.

 राणेंवर प्रश्न विचारू नये म्हणून शक्कलमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारू नये म्हणूनच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक संपताच काढता पाय घेतला आणि निघून गेले, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यात होती. कारण मंत्री पाटील यांच्या मागील सावंतवाडी दौºयावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांनी केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला होता.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलMaharashtraमहाराष्ट्र