शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कालव्याचा भराव खचला, रोणापाल येथील मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:59 AM

रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

ठळक मुद्देकालव्याचा भराव खचला, रोणापाल येथील घटना मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद

बांदा : रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.सावंतवाडी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसात रोणापाल येथील तिलारी कालव्याचा व जोडरस्त्याचा भराव खचून मार्गावर चिखल झाला आहे. रोणापाल-आंब्याचे गाळू, पाडलोस भाकरवाडी, सातीवनमळी येथील ग्रामस्थांना येथून ये-जा करावी लागते. तिलारी कालवा अधिकाऱ्यांचे याकडे झालेले दुर्लक्ष पाहून ग्रामस्थांनी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचे लक्ष वेधले.राजू शेटकर यांनी सहकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी युवासेना मळेवाड विभागाचे पदाधिकारी समीर नाईक, युवासेना पाडलोस शाखाधिकारी रोहित गावडे, रोणापाल माजी शाखाप्रमुख एकनाथ भोगटे व ग्रामस्थ उपस्थित होते.दोन दिवसांत मार्ग निर्धोक करण्याची ग्वाही : शेटकरवाहनचालक व ग्रामस्थांची होणारी गैरसोय व धोका लक्षात घेऊन शेटकर यांनी तिलारी कालव्याचे शाखा अभियंता मुद्गल यांच्याशी संपर्क साधून तत्काळ त्याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले. त्यांच्या मागणीस अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांत चिखलमय मार्ग निर्धोक करण्याची ग्वाही दिली, असे उपतालुकाप्रमुख शेटकर यांनी सांगितले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग