शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

‘बोटिंग’साठी व्यावसायिकांवर कु-हाड, आरवली-मोचेमाड किना-यावरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:50 IST

एका खासगी बोटिंग प्रकल्पासाठी चक्क हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या आरवली-मोचेमाड येथील समुद्र किना-यावर सुरू असून येथील स्थानिक वाळू व्यावसायिकांना विस्थापित करण्याचे संबंधित उद्योजकांचे काम  प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे.

सावंतवाडी - एका खासगी बोटिंग प्रकल्पासाठी चक्क हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या आरवली-मोचेमाड येथील समुद्र किना-यावर सुरू असून येथील स्थानिक वाळू व्यावसायिकांना विस्थापित करण्याचे संबंधित उद्योजकांचे काम  प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक व्यावसायिकांनी माजी आमदार राजन तेली यांची भेट घेतली असून भाजप याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे.आरवली येथे गोव्यातील एका उद्योजकाने हॉटेलची उभारणी केली आहे. हे हॉटेल बांधूनही पूर्ण झाले. मात्र अद्यापपर्यंत ते सुरू केले नाही. मात्र या उद्योजकाने प्रशासनापुढे आता नवीनच अट घातली आहे. यात या हॉटेलच्या समोरचा समुद्राचा भाग बोटिंग प्रकल्पासाठी द्यावा, अशी मागणी केली आहे. ही मागणी राज्य शासनाकडे केल्यानंतर चार दिवसांपूर्वी प्रशासनाचे सर्व अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच मेरीटाईम व खनिकर्म अधिकारी आरवली-मोचेमाड येथे दाखल झाले व त्यांनी तेथील स्थानिक वाळू व्यावसायिकांची भेट घेऊन तुम्ही तत्काळ येथील वाळू उत्खनन थांबवा, अशी मागणी केली.मात्र तेथील वाळू व्यावसायिकांनी याला ठामपणे नकार दिला. त्यामुळे हे सर्व अधिकारी आल्या पावली निघून गेले. मात्र अधिकारी निघून गेल्यानंतर येथील वाळू व्यावसायिकांना प्रशासनाच्यावतीने नोटीस पाठविली. यात तातडीने हा भाग खाली करा, असे सांगितले. मात्र अद्याप वाळू व्यावसायिकांनी यावर निर्णय घेतला नाही. व्यावसायिकांनी जी निविदा भरली आहे, तिची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. ७० लाख रुपये भरून हा ठेका घेण्यात आला आहे. यामध्ये अनेकांनी रोजीरोटी मिळावी यासाठी पैसे भरले आहेत. यातून सरकारला महसुलापोटी आतापर्यंत साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत. एवढा महसूल देणारी जिल्ह्यातील ही एकमेव खाडी आहे. असे असतानाही एका उद्योजकाच्या बोटिंग प्रकल्पासाठी शेकडो बेरोजगार युवकांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या नोटिसीला माजी आमदार राजन तेली यांनी आक्षेप घेतला आहेजी खाडी सर्वाधिक महसूल देत आहे, अशा ठिकाणी खासगी बोटिंग कशासाठी आणि बोटिंग जर करायचे असेल तर निविदेचा कालावधी अजून दीड महिना असताना आताच त्यांना तेथून विस्थापित करण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करीत प्रशासन उद्योजकांसाठी स्थानिकांना बाजूला करीत असेल तर भाजप हे सहन करणार नाही. प्रसंगी आंदोलन उभे करू, असा इशारा तेली यांनी दिला आहे. तर वाळू व्यावसायिकही आक्रमक झाले असून अनेकजण या व्यवसायावर जगत आहेत. त्यांना अचानक नोटीस देऊन बाजूला कसे काय प्रशासन करू शकते, असा सवाल उपस्थित केला आहे. जेटीवर जाण्याचे आदेश आमचे नाहीत प्रशासनाचे अधिकारी आरवली-मोचेमाड येथे गेले असतील तर आम्हांला याची माहिती नाही. मी प्रांताधिकारी म्हणून कोणताही आदेश दिला नव्हता किंवा कार्यालयाने दिला नव्हता. त्यामुळे हे आदेश कुणाचे मला माहीत नाही, असे सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण