शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:29 IST

Fire sindhudurg-आचरा शेतमाळावर रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देआचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाकलाखो रुपयांचे नुकसान : देऊळवाडीतील ग्रामस्थांची धाव

आचरा : आचरा शेतमाळावर रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.ऐन आंबा हंगामात धरलेली आंब्याची कलमे आगीत जळून गेल्याने शेतकऱ्यांची हानी झाली आहे. आग लागल्याचे समजताच आचरा देऊळवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही बागा वाचविण्यात यश आले. ही आग आचरा शेतमाळावर पसरत चालली होती. आचरा येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून मिळेल त्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते.आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशांत घाडी, परेश सावंत, उदय बापर्डेकर, अक्षय घाडी, आकाश घाडी, अजय घाडी, संकेत घाडी, भाऊ घाडी, नितीन घाडी, धोंडू घाडी, सुधीर घाडी, चंद्रकांत घाडी, चंद्रसुहास घाडी, उदय घाडी, रवींद्र घाडी यांनी प्रयत्न केले. संपदा आचरेकर, तन्वी आचरेकर, दिशा आचरेकर या मुलींनी बोअरिंगचे पाणी आणून देत आग आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पाण्याचा मारा सुरू करीत आगीवर ताबा मिळवित इतर बागांचे होणारे मोठे नुकसान त्यामुळे टळले.सुकलेल्या गवतामुळे आगीचे रौद्ररुपरविवारी दुपारच्या सुमारास आचरा शेतमाळावर अचानकपणे आग लागली. विलास घाडी, चंद्रकांत घाडी यांची धरलेली आंबा कलमे, अरविंद सावंत यांची लहान आंबा कलमे जळून गेली. यात घाडी कुटुंबाची आंबा कलमे जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बांबूची बेटेही आगीत खाक झाली. जोरदार वाऱ्यामुळे आणि सुकलेल्या गवतामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग