शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कुडाळ तालुक्यात साजरा झाला बंधारा दिवस, केवळ लोकसहभागातून बांधले ३६९ बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 19:11 IST

कुडाळ तालुक्यातील पाणी पातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय निधीचा वापर न करता केवळ लोकसहभाग व श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३६९ बंधारे बांधले असुन अशा प्रकारे एकाच दिवशी बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविणारी कुडाळ पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरणार आहे.

ठळक मुद्देलोकसहभाग, श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये एकाच दिवशी ३६९ बंधारे येत्या काही दिवसात हजार बंधारे बांधण्याचा सकंल्प एकाच दिवशी बंधारे बांधणारी कुडाळ पंचायत समिती राज्यातील एकमेव

कुडाळ (सिंधुदुर्ग) : कुडाळ तालुक्यातील पाणी पातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय निधीचा वापर न करता केवळ लोकसहभाग व श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३६९ बंधारे बांधले असुन अशा प्रकारे एकाच दिवशी बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविणारी कुडाळ पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरणार आहे. येत्या काही दिवसात हजार बंधारे बांधण्याचा सकंल्प या समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई असते तर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडुन ही या ठिकाणच्या अनेक गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुंळे जमिनीतील पाणी पातळी वाढवुन पाणी टंचाई टाळण्यासाठी शासनाच्या वतीने वनराई बंधारे मोहीम दरवर्षी राबविली जाते.

या वर्षी ही कुडाळ तालुक्यात कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बांधण्यात येणार्या १ हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार असुन पंचायत समितीच्या वतीने शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर हा दिवस बंधारा दिवस साजरा करून या दिवशी २०० बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे जिल्हापरिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पं. स. सदस्य नुतन आईर, वेताळ बांबर्डे नवनिर्वाचित सरपंच संध्या मेस्त्री, प्रभारी सरपंच दिलीप तिवरेकर, कृषी अधिकारी आर. जी. चोडणकर, प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, नागेश आईर, ग्रामसेवक बी. डी. पिंटो, न्हानू शेळके, संतोष कदम, आंबेरकर, महादेव खरात, मंगेश जाधव, नितिन नानचे उपस्थित होते.

यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र योग्य नियोजन नसल्याने काही गावात पाणी टंचाई होते. आता या जिल्ह्यात बंधारे बांधण्याचे योग्य नियोजन करून पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.

कुडाळ पंचायत समितीने या तालुक्यात हा बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्यामुंळे या तालुक्यातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असुन निश्चितच या तालुक्यात पाणी टंचाई होणार नाही.

यावेळी राजन जाधव यांनी या बंधारे बांधण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही योग्य नियोजन केले असुन या तालुक्यात हजार पेक्षाही जास्त बंधारे बांधुन भविष्यातील पाणी टंचाईवर मात करणार आहोत.ही आता लोकचळवळ - विजय चव्हाणकुडाळ तालुक्यात या पुर्वी वनराई व कच्चे बंधारे बांधण्यात येत होते. यावर्षी मात्र या तालुक्याच्या भौगोलिक व नैसर्गिक स्थितीनुसार काही गावामंध्ये विजय खरी बंधारे हे नविन बंधारे संकल्पना अंमलात आणुन जास्तीत जाल्त पाणी हे कसे अडविले जाईल या साठी प्रयत्न केला असुन बंधारे बांधणे ही आता लोकचळवळ झाली असल्याचे विजय चव्हाण यांनी सांगितले.

या तालुक्यात हा बंधारे बांधण्याचा उपक्रम यशस्वी होण्याकरीता तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, सामाजिक - क्रिडा मंडळे, बचतगट, विविध संस्था, कर्मचारी संघटना व ग्रामस्थ यांनी सहभाग घेवुन श्रमदानातुन हे बंधारे बांधले आहेत.

एकाच दिवसात ३६९ बंधारे बांधलेकोणताही शासकीय निधी नसताना ही योग्य नियोजन, लोकसहभाग व श्रमदानातुन संपुर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी वनराई बंधारे (१७३), कच्चे बंधारे (९८), विजय बंधारे (६७), खरी बंधारे (३१) असे मिळुन एकुण ३६९ बंधारे बांधले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDamधरण