शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

साबुदाणा लागवड कोकणसाठी वरदान

By admin | Published: June 12, 2016 9:29 PM

नावीन्यपूर्ण पिकांची गरज : सात महिन्यांत फायदा देणारे पीक

कडावल : शेवरकंद म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. केवळ सहा ते सात महिन्यांचे पीक, साबुदाण्याला बाजारात वर्षभर असणारी मागणी तसेच उत्पादनाला मिळणाऱ्या दरामुळे साबुदाणा लागवड किफायतशीर ठरत असून, आर्थिक सुबत्तेसाठी शेतकऱ्यांनी या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रातही आता आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहे. नावीन्यवपूर्ण प्रयोगांद्वारे शेतीच्या विकासाबरोबरच स्वत:च्या आर्थिक संपन्नतेसाठी येथील शेतकरी झटत आहेत. परिणामी येथील शेत शिवार विविध पिकांनी डोलताना दिसत आहेत. कोकणातील हवामान व जमिनीला मानवणारे शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याच्या झाडांची लागवड फायदेशीर ठरत आहे. आर्थिक सुबत्तेसाठी येथील शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण पिकाच्या लागवडीकडे वळणे गरजेचे आहे.साबुदाण्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. केवळ सहा ते सात महिन्यांत हे पीक काढण्यास तयार होते. प्रति हेक्टरी सुमारे पंचवीस टन उत्पादन मिळते, तर साबुदाण्याच्या पावडरला बाजारात प्रतिकिलो सुमारे ५५ रुपये दर मिळतो. साबुदाण्याची पावडर घरीच बनविता येत असल्याने शेतकऱ्यांना यापासून गृहद्योगही सुरू करता येतो. एकंदरीत शेवरकंदाची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.अखिल भारतीय समन्वित एकात्मिक कृषी संशोधन, योजनेचे अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. नामदेव म्हसकर याबाबत बोलताना म्हणाले, शेवरकंद म्हणजे म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते. साबुदाण्याला बाजारात वर्षभर मागणी असते. साबुदाण्याची पावडर शेतकरी आपल्या घरीच तयार करू शकतात. या पावडरला दरही चांगला मिळतो. लागवडीसाठी एच-११९, श्री जया किंवा श्री प्रकाश या जातींची निवड करावी, असे आवाहनही डॉ. म्हसकर यांनी केले आहे. (वार्ताहर)शेवरकंदाची लागवड सरी वरंबा पद्धतीने केली जाते. लागवडीसाठी ६ ते १० महिने वयाच्या योग्य वाढ झालेल्या निरोगी झाडांच्या खोडाचे २० ते २५ सेंटिमीटर लांबीचे तुकडे वापरण्यात येतात. लागवड जातीनिहाय ९० बाय ९० सेंटिमीटर किंवा ७५ बाय ७५ सेंटिमीटर अंतरावर करावी. एक हेक्टर लागवडीसाठी सुमारे १२३५० ते १७७८० कांड्या पुरतात. लागवडीनंतर योग्य प्रमाणात खते, पाणी, मशागत, बेनणी तसेच भर देणे, आदी कामे वेळोवेळी पूर्ण करणे आवश्यक आहे.कोकण विभागासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनात या पिकासाठी हेक्टरी ७.५ टन शेणखत तसेच नत्र:स्फुरद:पालाश अनुक्रमे ७५:५०:७५ मात्रा देण्यात यावी. सोबत २० किलो धैचा बियाणे लागवडीवेळी पेरून भरीच्या वेळी जमिनीत गाडावे.लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी पहिली बेनणी करून सरीवर रोपांना भर द्यावी. नंतर एक महिन्याने पुन्हा एकदा भर देणे गरजेचे असून, यावेळी खताचा दुसरा हप्ता द्यावा. पिकाला आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.