शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:00 IST

राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन कर्जमाफी फसवी ठरल्याचाही आरोप

वैभववाडी : राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

भाजपाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे संकट आहे म्हणून खरीप हंगाम थांबणार नाही. परंतु राज्य सरकारकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही. सरकारने बांधावर बियाणे आणि खत पुरविण्याची योजना जाहीर केली; परंतु ती पूर्णत: असफल ठरली आहे.

शेतकऱ्यांना अजूनही खते मिळालेली नाहीत. दुसरीकडे जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाच्या याद्या तयार होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना झालेला नाही. याशिवाय नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचा त्वरित कर्जमाफीच्या यादीत समावेश करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.तालुक्यात एसटी सेवा सुरू करालॉकडाऊनमुळे तालुक्यातील संपूर्ण एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एसटी बससेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी भाजपतर्फे स्वतंत्र निवेदनाद्वारे नायब तहसीलदार ए. के. नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.कर्जमाफीपासून शेतकरी वंचितशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना झालेला नाही. भाजपा सरकारने खावटी कर्जधारक शेतकऱ्यांना मंजूर केलेले १३ कोटी रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत. शासनाच्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. 

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपाTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग