शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:00 IST

राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन कर्जमाफी फसवी ठरल्याचाही आरोप

वैभववाडी : राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

भाजपाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे संकट आहे म्हणून खरीप हंगाम थांबणार नाही. परंतु राज्य सरकारकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही. सरकारने बांधावर बियाणे आणि खत पुरविण्याची योजना जाहीर केली; परंतु ती पूर्णत: असफल ठरली आहे.

शेतकऱ्यांना अजूनही खते मिळालेली नाहीत. दुसरीकडे जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाच्या याद्या तयार होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना झालेला नाही. याशिवाय नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचा त्वरित कर्जमाफीच्या यादीत समावेश करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.तालुक्यात एसटी सेवा सुरू करालॉकडाऊनमुळे तालुक्यातील संपूर्ण एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एसटी बससेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी भाजपतर्फे स्वतंत्र निवेदनाद्वारे नायब तहसीलदार ए. के. नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.कर्जमाफीपासून शेतकरी वंचितशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना झालेला नाही. भाजपा सरकारने खावटी कर्जधारक शेतकऱ्यांना मंजूर केलेले १३ कोटी रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत. शासनाच्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. 

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपाTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग