शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

त्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:00 IST

राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या योजनेचा बोजवारा, वैभववाडी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन कर्जमाफी फसवी ठरल्याचाही आरोप

वैभववाडी : राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, किशोर दळवी, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

भाजपाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे संकट आहे म्हणून खरीप हंगाम थांबणार नाही. परंतु राज्य सरकारकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही. सरकारने बांधावर बियाणे आणि खत पुरविण्याची योजना जाहीर केली; परंतु ती पूर्णत: असफल ठरली आहे.

शेतकऱ्यांना अजूनही खते मिळालेली नाहीत. दुसरीकडे जिल्हा बँकेकडून कर्ज वाटपाच्या याद्या तयार होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप अनेक शेतकऱ्यांना झालेला नाही. याशिवाय नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचा त्वरित कर्जमाफीच्या यादीत समावेश करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.तालुक्यात एसटी सेवा सुरू करालॉकडाऊनमुळे तालुक्यातील संपूर्ण एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एसटी बससेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी भाजपतर्फे स्वतंत्र निवेदनाद्वारे नायब तहसीलदार ए. के. नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.कर्जमाफीपासून शेतकरी वंचितशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना झालेला नाही. भाजपा सरकारने खावटी कर्जधारक शेतकऱ्यांना मंजूर केलेले १३ कोटी रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत. शासनाच्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. 

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपाTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग