शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आंबोलीतील मलई पठाराला झळाळी येणार्

By admin | Updated: January 2, 2017 23:43 IST

$िंवनविभागाकडून आराखडा तयार : उंच मनोऱ्याबरोबरच लाकडी माच, मातीचे रस्ते बनविणार

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीपर्यटन दृष्ट्या आंबोलीला समृध्द करण्यमासाठी आंबोली चौकुळ रस्त्यावरील मलई पठाराला नवी झळाळी देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या मलई पठारावर वनविभाग उंच मनोरे, लाकडी माच, मातीचे रस्ते तयार करणार आहे. या कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून, यासाठी जिल्हा नियोजन विभाग निधी देणार आहे.आंबोलीची ओळख ही धबधब्यामध्ये होती. ही ओळख कामय ठेवत वनविभागाने आंबोलीचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आंबोलीच्या भौगोलिक रचनेचा वापर करून घेण्यात आला आहे. आंबोली-चौकुळ रस्त्यावर मलई पठार नावाचे पूर्वीपासून क्षेत्र आहे. मात्र, हा पठार विकासाच्या प्रकियेत आणण्याबाबत कुणाच्याच लक्षात आले नव्हते. प्रथमच वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.मलई पठाराचा काही भाग हा घनदाट जंगलाने व्यापला आहे. या भागात विविध प्राणी आहेत. यात वाघ, हरीण, सांबर, अस्वल आदींचा समावेश आहे. तर आंबोलीत गवारेड्यांचे प्रमाण अधिक असून, या पठारावर तर सायंकाळी हमखास हे प्राणी दिसतात. त्यामुळे याठिकाणी डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत अनेक पर्यटक येत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्याही वाढत जात आहे. या परिसराचा विकास झाल्यास येथे पर्यटक थांबू शकेल, असे वाटत असल्यानेच वनविभागाने हे मलई पठार विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.या मलई पठाराचा विकास करीत असताना मुंबई, पुणे, गोवा येथील पर्यटकांना ग्रामीण रचेनेचे खास आकर्षण असल्याने या ठिकाणी वनविभाग कच्चे मातीचे रस्ते बनविणार आहे. तसेच उंच उंच मनोरेही उभारणार आहे. जेणे करून येणारा पर्यटक वर चढून परिसराचे छायाचित्र काढू शकतो. तसेच लाकडी माच उभारण्यात येणार आहेत. या माचांवर पर्यटक काही काळ थांबू शकतो. या शिवायही अन्य काही बाबींचा समावेश यात करण्यात येणार आहे. त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाची अद्याप मंजुरी मिळाली नाही. मात्र, ती लवकरच मिळेल अशी आशा आहे.त्यानंतर जिल्हा नियोजन विभागातून या कामाला निधी मिळणार आहे. सध्या तरी या कामाला आराखड्याप्रमाणे १० लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या आराखड्यात बदल झाला तर निधी वाढू शकतो, असे वनविभागाचे म्हणणे आहे. मलई पठार विकसित झाले की येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीट लावायचे की नाही, याचा निर्णय मात्र अद्यापपर्यंत वनविभागाने घेतला नाही.