शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील मलई पठाराला झळाळी येणार्

By admin | Updated: January 2, 2017 23:43 IST

$िंवनविभागाकडून आराखडा तयार : उंच मनोऱ्याबरोबरच लाकडी माच, मातीचे रस्ते बनविणार

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीपर्यटन दृष्ट्या आंबोलीला समृध्द करण्यमासाठी आंबोली चौकुळ रस्त्यावरील मलई पठाराला नवी झळाळी देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या मलई पठारावर वनविभाग उंच मनोरे, लाकडी माच, मातीचे रस्ते तयार करणार आहे. या कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून, यासाठी जिल्हा नियोजन विभाग निधी देणार आहे.आंबोलीची ओळख ही धबधब्यामध्ये होती. ही ओळख कामय ठेवत वनविभागाने आंबोलीचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आंबोलीच्या भौगोलिक रचनेचा वापर करून घेण्यात आला आहे. आंबोली-चौकुळ रस्त्यावर मलई पठार नावाचे पूर्वीपासून क्षेत्र आहे. मात्र, हा पठार विकासाच्या प्रकियेत आणण्याबाबत कुणाच्याच लक्षात आले नव्हते. प्रथमच वनविभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.मलई पठाराचा काही भाग हा घनदाट जंगलाने व्यापला आहे. या भागात विविध प्राणी आहेत. यात वाघ, हरीण, सांबर, अस्वल आदींचा समावेश आहे. तर आंबोलीत गवारेड्यांचे प्रमाण अधिक असून, या पठारावर तर सायंकाळी हमखास हे प्राणी दिसतात. त्यामुळे याठिकाणी डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत अनेक पर्यटक येत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्याही वाढत जात आहे. या परिसराचा विकास झाल्यास येथे पर्यटक थांबू शकेल, असे वाटत असल्यानेच वनविभागाने हे मलई पठार विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.या मलई पठाराचा विकास करीत असताना मुंबई, पुणे, गोवा येथील पर्यटकांना ग्रामीण रचेनेचे खास आकर्षण असल्याने या ठिकाणी वनविभाग कच्चे मातीचे रस्ते बनविणार आहे. तसेच उंच उंच मनोरेही उभारणार आहे. जेणे करून येणारा पर्यटक वर चढून परिसराचे छायाचित्र काढू शकतो. तसेच लाकडी माच उभारण्यात येणार आहेत. या माचांवर पर्यटक काही काळ थांबू शकतो. या शिवायही अन्य काही बाबींचा समावेश यात करण्यात येणार आहे. त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाची अद्याप मंजुरी मिळाली नाही. मात्र, ती लवकरच मिळेल अशी आशा आहे.त्यानंतर जिल्हा नियोजन विभागातून या कामाला निधी मिळणार आहे. सध्या तरी या कामाला आराखड्याप्रमाणे १० लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या आराखड्यात बदल झाला तर निधी वाढू शकतो, असे वनविभागाचे म्हणणे आहे. मलई पठार विकसित झाले की येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीट लावायचे की नाही, याचा निर्णय मात्र अद्यापपर्यंत वनविभागाने घेतला नाही.