शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:53 IST

gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देतेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी मांगवली, वेंगसर ग्रामपंचायतींवर केला दावा

वैभववाडी : निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.येथील भाजप कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, किशोर दळवी, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.काझी म्हणाले, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. परंतु निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या विजयाची श्रुंखला सुरू झाली आहे. तालुक्यातील १०३ पैकी २८ जागा बिनविरोध आल्या असून, त्या भाजपच्या आहेत. मांगवली ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

वेंगसर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागांची निवड बिनविरोध झाली असून, त्या सर्व जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी असून, त्या तारखेपर्यंत भाजपच्या आणखी काही जागा बिनविरोध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित ११ ही ग्रामपंचायतींवर येत्या काळात भाजपचेच वर्चस्व दिसून येणार आहे.पक्षाच्या लोकाभिमुख धोरणामुळे विरोधी पक्षात काम करणाऱ्या अनेकांना भाजपचे आकर्षण आहे. निवडणुकीला इतर पक्षातून उभे राहिलेले अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. परंतु आमच्या पक्षाचे पॅनेल त्या गावात असल्यामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश घेण्यास अडचण झालेली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.धमक्यांना घाबरत नाहीकाही गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या महिला उमेदवारांना विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे धमक्या देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार आहे. आम्ही कुणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. कारण आमचे नेतृत्व सक्षम आहे, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग