शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:53 IST

gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देतेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी मांगवली, वेंगसर ग्रामपंचायतींवर केला दावा

वैभववाडी : निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केला.येथील भाजप कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, किशोर दळवी, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.काझी म्हणाले, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. परंतु निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या विजयाची श्रुंखला सुरू झाली आहे. तालुक्यातील १०३ पैकी २८ जागा बिनविरोध आल्या असून, त्या भाजपच्या आहेत. मांगवली ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून ती भाजपच्या ताब्यात आली आहे.

वेंगसर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागांची निवड बिनविरोध झाली असून, त्या सर्व जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी असून, त्या तारखेपर्यंत भाजपच्या आणखी काही जागा बिनविरोध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित ११ ही ग्रामपंचायतींवर येत्या काळात भाजपचेच वर्चस्व दिसून येणार आहे.पक्षाच्या लोकाभिमुख धोरणामुळे विरोधी पक्षात काम करणाऱ्या अनेकांना भाजपचे आकर्षण आहे. निवडणुकीला इतर पक्षातून उभे राहिलेले अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. परंतु आमच्या पक्षाचे पॅनेल त्या गावात असल्यामुळे तूर्तास त्यांचा प्रवेश घेण्यास अडचण झालेली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.धमक्यांना घाबरत नाहीकाही गावांमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या महिला उमेदवारांना विरोधकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे धमक्या देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली जाणार आहे. आम्ही कुणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. कारण आमचे नेतृत्व सक्षम आहे, असे मत नासीर काझी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग