शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजपने राणेंना वाटेल तितकी ताकद पुरवावी, शिवसेना पुन्हा भगवा फडकवणारच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:59 IST

Vaibhav Naik Shivsena Sindhudurg- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देभाजपने राणेंना वाटेल तितकी ताकद पुरवावीशिवसेना पुन्हा भगवा फडकवणारच  :वैभव नाईक

कणकवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षही त्यांना सोडावा लागला होता. त्यामुळे राणेंना ताकद पुरवताना ते पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात निवडणूक लढवणार किंवा नाही, याची खातरजमा शहांनी करून घ्यावी.जर राणेंनी पुढची विधानसभा निवडणूक लढवली, तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून सर्वस्वी माझी राहील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख ह्यमहाराष्ट्राचे दबंग नेतेह्ण असा केला. मग, या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देताना ह्यतारीख पे तारीखह्ण देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यांनी द्यायला हवे होते.राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्यावर केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शहा यांनी आवर्जून पहावा. अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले. तसेच शिवसेना संपवण्याची भाषासुद्धा केली. पण त्यांना ते शक्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.भाजपने त्यांचे विचार कोठे बुडविले?शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडविले, असे ते म्हणतात. मग, जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कोणत्या नाल्यात बुडविले होते, असा प्रश्नही या प्रसिद्धीपत्रकात वैभव नाईक यांनी केला आहे.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग