शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

भाजपने राणेंना वाटेल तितकी ताकद पुरवावी, शिवसेना पुन्हा भगवा फडकवणारच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:59 IST

Vaibhav Naik Shivsena Sindhudurg- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देभाजपने राणेंना वाटेल तितकी ताकद पुरवावीशिवसेना पुन्हा भगवा फडकवणारच  :वैभव नाईक

कणकवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षही त्यांना सोडावा लागला होता. त्यामुळे राणेंना ताकद पुरवताना ते पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात निवडणूक लढवणार किंवा नाही, याची खातरजमा शहांनी करून घ्यावी.जर राणेंनी पुढची विधानसभा निवडणूक लढवली, तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून सर्वस्वी माझी राहील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख ह्यमहाराष्ट्राचे दबंग नेतेह्ण असा केला. मग, या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देताना ह्यतारीख पे तारीखह्ण देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यांनी द्यायला हवे होते.राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्यावर केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शहा यांनी आवर्जून पहावा. अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले. तसेच शिवसेना संपवण्याची भाषासुद्धा केली. पण त्यांना ते शक्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.भाजपने त्यांचे विचार कोठे बुडविले?शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडविले, असे ते म्हणतात. मग, जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कोणत्या नाल्यात बुडविले होते, असा प्रश्नही या प्रसिद्धीपत्रकात वैभव नाईक यांनी केला आहे.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग