शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 16:39 IST

मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

ठळक मुद्देमराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाहीक्या हुआ तेरा वादा असे विचारावस वाटतेयनितेश राणे यांची टीका

सिंधुदुर्ग: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील बडा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या कारवाईवर मोठे प्रश्न उपस्थित करून ही प्रकरण फेक असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणात न्यायालयाने आर्यन खानला जामीन नाकारल्यामुळे त्याचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही आर्यन खानच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक पाकिस्तानचे एजंट असून, पाकिस्तानमधील ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

नितेश राणे सिंधुदुर्गात मीडियाशी बोलत होते. नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाले आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे, हे त्यांना कळत नाही, या शब्दांत नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला. 

मराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाही

शिवसेनेची सत्ता असताना समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. मराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू म्हणवून घेणे हे पाप झाले आहे. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवे, असा टोला लगावत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

क्या हुआ तेरा वादा असे विचारावस वाटतेय

मराठवाडा, विदर्भ किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न पडला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना ५० हजार देणार असे वचन दिले गेले होते. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा असे विचारावसे वाटत आहे. विरोधीपक्षात असताना हीच मंडळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तोडफोड करून आले होते. आता तोडपाणी झाली नाही ना, अशी विचारणा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केली. 

दरम्यान, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे. ड्रग्सबद्दल बोलायचे, एनसीबीबद्दल बोलायचे, पण शेतकऱ्यांना बद्दल बोलायचे नाही. दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या वाईट स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रातला शेतकरी ठाकरे सरकार आल्यापासून अंधारात आहे.  मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोNitesh Raneनीतेश राणे nawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे