शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

भिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:32 IST

Farmer Sindhudurg- जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देभिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू पडीक जमीन लागवडीखाली आणूया : सतीश सावंत

कणकवली : जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.भिरवंडे गावामध्ये सध्या ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबविला जात असून, त्याचा शुभारंभ जांभूळभाटलेवाडी येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन सावंत, सरचिटणीस सागर सावंत, कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नागेश सावंत, उपसरपंच नितीन सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन मंगेश सावंत, राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्या रश्मी सावंत, ग्रामसेवक राकेश गोवळकर, भाई सावंत, सुभाष सावंत, नंदकुमार सावंत, सुरेशचंद्र सावंत, सत्यवान सावंत, आबा सावंत, स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ उपस्थित होते.जांभूळभाटले सेवामंडळाच्यावतीने सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत व सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, ग्रामसेवक राकेश गोवळकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ग्रामविकासासाठी जांभूळभाटले सेवामंडळाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असे सागर सावंत यांनी सांगितले.

जांभूळभाटलेवाडीतील रखडलेल्या विकासकामांविषयी नागरिकांनी चर्चेतून सहभाग घेतला. ग्रामस्थांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक तो पाठपुरावा निश्‍चितपणे करेल, असे भिरवंडे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. आभार ग्रामसेवक राकेश गोवळकर यांनी मानले.ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या योजना सक्षमपणे राबवाव्यातगावचा विकास साधताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः पडीक जमिनीच्या विकासासाठी फळबाग लागवडीबरोबरच बांबू लागवडीकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेत पडीक जमिनीमध्ये अधिक बांबू लागवड कशी होईल याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग