शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

भिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:32 IST

Farmer Sindhudurg- जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देभिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू पडीक जमीन लागवडीखाली आणूया : सतीश सावंत

कणकवली : जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.भिरवंडे गावामध्ये सध्या ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबविला जात असून, त्याचा शुभारंभ जांभूळभाटलेवाडी येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन सावंत, सरचिटणीस सागर सावंत, कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नागेश सावंत, उपसरपंच नितीन सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन मंगेश सावंत, राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्या रश्मी सावंत, ग्रामसेवक राकेश गोवळकर, भाई सावंत, सुभाष सावंत, नंदकुमार सावंत, सुरेशचंद्र सावंत, सत्यवान सावंत, आबा सावंत, स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ उपस्थित होते.जांभूळभाटले सेवामंडळाच्यावतीने सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत व सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, ग्रामसेवक राकेश गोवळकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ग्रामविकासासाठी जांभूळभाटले सेवामंडळाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असे सागर सावंत यांनी सांगितले.

जांभूळभाटलेवाडीतील रखडलेल्या विकासकामांविषयी नागरिकांनी चर्चेतून सहभाग घेतला. ग्रामस्थांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक तो पाठपुरावा निश्‍चितपणे करेल, असे भिरवंडे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. आभार ग्रामसेवक राकेश गोवळकर यांनी मानले.ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या योजना सक्षमपणे राबवाव्यातगावचा विकास साधताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः पडीक जमिनीच्या विकासासाठी फळबाग लागवडीबरोबरच बांबू लागवडीकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेत पडीक जमिनीमध्ये अधिक बांबू लागवड कशी होईल याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग