शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

भिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:32 IST

Farmer Sindhudurg- जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

ठळक मुद्देभिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू पडीक जमीन लागवडीखाली आणूया : सतीश सावंत

कणकवली : जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.भिरवंडे गावामध्ये सध्या ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबविला जात असून, त्याचा शुभारंभ जांभूळभाटलेवाडी येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन सावंत, सरचिटणीस सागर सावंत, कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नागेश सावंत, उपसरपंच नितीन सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन मंगेश सावंत, राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्या रश्मी सावंत, ग्रामसेवक राकेश गोवळकर, भाई सावंत, सुभाष सावंत, नंदकुमार सावंत, सुरेशचंद्र सावंत, सत्यवान सावंत, आबा सावंत, स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ उपस्थित होते.जांभूळभाटले सेवामंडळाच्यावतीने सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत व सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, ग्रामसेवक राकेश गोवळकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ग्रामविकासासाठी जांभूळभाटले सेवामंडळाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असे सागर सावंत यांनी सांगितले.

जांभूळभाटलेवाडीतील रखडलेल्या विकासकामांविषयी नागरिकांनी चर्चेतून सहभाग घेतला. ग्रामस्थांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक तो पाठपुरावा निश्‍चितपणे करेल, असे भिरवंडे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. आभार ग्रामसेवक राकेश गोवळकर यांनी मानले.ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या योजना सक्षमपणे राबवाव्यातगावचा विकास साधताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः पडीक जमिनीच्या विकासासाठी फळबाग लागवडीबरोबरच बांबू लागवडीकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेत पडीक जमिनीमध्ये अधिक बांबू लागवड कशी होईल याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग