शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:43 IST

लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी पदाधिकाऱ्यांच्या तालुकावार बैठका

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सिंधुदुर्ग भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. ७ मार्च पासून पदाधिकाऱ्यांच्या दौºयाला प्रारंभ झाला. दोडामार्ग ,सावंतवाडी, मालवण असा दौरा करण्यात आला. ८ मार्च रोजी देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकांना भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर उपस्थित होते. तर या संपूर्ण दौºयात सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस जयदेव कदम, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, यशवंत आठलेकर आढावा घेण्यासाठी अतुल काळसेकर यांच्यासह उपस्थित होते.दरम्यान, भाजपा-शिवसेना युती जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवरून सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाराजीचा सूर लावला होता.

त्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांचीच री ओढत बंड पुकारले होते. त्यानंतर अतुल काळसेकर यांनी खासदार विनायक राऊत यांनी पक्षपाती राजकारण केल्याचा आरोप केला होता. तसेच काळसेकर यांनी युतीच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

२०१४ च्या निवडणुकीत राऊत यांच्या विजयात स्वत: काळसेकर, प्रमोद जठार, रत्नागिरीचे बाळ माने यांचा मोलाचा वाटा होता, परंतु राऊत यांनी विजयानंतर सिंधुदुर्ग भाजपाशी कायमच पक्षपाती धोरण अवलंबत विकास निधीसाठी कायमच ठेंगा दाखवला शिवाय कोणत्याही कार्यक्रमांनासुद्धा निमंत्रित केलेले नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

जिल्ह्यात विकास कामे करण्यात खासदार विनायक राऊत अपयशी ठरले असून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्यात विकासकामे आणली असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.एकंदरच युती मधील ताणली गेलेली परिस्थिती, प्रमोद जठार यांनी घेतलेले बंडाचे धोरण पाहता अतुल काळसेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा दौरा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग भाजपा काय निर्णय घेणार आणि लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना मदत होणार का? याबाबत जनतेमध्ये औत्सुक्य आहे.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग