शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:43 IST

लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी पदाधिकाऱ्यांच्या तालुकावार बैठका

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सिंधुदुर्ग भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. ७ मार्च पासून पदाधिकाऱ्यांच्या दौºयाला प्रारंभ झाला. दोडामार्ग ,सावंतवाडी, मालवण असा दौरा करण्यात आला. ८ मार्च रोजी देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकांना भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर उपस्थित होते. तर या संपूर्ण दौºयात सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस जयदेव कदम, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, यशवंत आठलेकर आढावा घेण्यासाठी अतुल काळसेकर यांच्यासह उपस्थित होते.दरम्यान, भाजपा-शिवसेना युती जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवरून सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाराजीचा सूर लावला होता.

त्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांचीच री ओढत बंड पुकारले होते. त्यानंतर अतुल काळसेकर यांनी खासदार विनायक राऊत यांनी पक्षपाती राजकारण केल्याचा आरोप केला होता. तसेच काळसेकर यांनी युतीच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

२०१४ च्या निवडणुकीत राऊत यांच्या विजयात स्वत: काळसेकर, प्रमोद जठार, रत्नागिरीचे बाळ माने यांचा मोलाचा वाटा होता, परंतु राऊत यांनी विजयानंतर सिंधुदुर्ग भाजपाशी कायमच पक्षपाती धोरण अवलंबत विकास निधीसाठी कायमच ठेंगा दाखवला शिवाय कोणत्याही कार्यक्रमांनासुद्धा निमंत्रित केलेले नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

जिल्ह्यात विकास कामे करण्यात खासदार विनायक राऊत अपयशी ठरले असून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्यात विकासकामे आणली असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.एकंदरच युती मधील ताणली गेलेली परिस्थिती, प्रमोद जठार यांनी घेतलेले बंडाचे धोरण पाहता अतुल काळसेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा दौरा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग भाजपा काय निर्णय घेणार आणि लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना मदत होणार का? याबाबत जनतेमध्ये औत्सुक्य आहे.

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग