शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

आचारसंहितेचे बंधन मागे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 12:34 IST

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील असंख्य वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या असताना जिल्हाधिकारी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत पाणी टंचाई कामांना मंजुरी देण्यास ...

ठळक मुद्देआचारसंहितेचे बंधन मागे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी मिळणार ?जिल्ह्यात अनेक वाड्या तहानलेल्या ;जिल्हाधिकारी प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील असंख्य वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या असताना जिल्हाधिकारी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत पाणी टंचाई कामांना मंजुरी देण्यास टाळले होते. २३ मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आतातरी जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी देणार का ? असा प्रश्न तहानलेल्या नागरिकांतून विचारला जात आहे.खरं तर आरोग्य व पाणी या विषयासाठी आचारसंहितेचे कोणतेच बंधन नसते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र, यावेळी प्रथमच जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त असताना या कामांना मंजुरी देण्याचे टाळले आहे. याबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त होत होती.

१६ मे रोजी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची संयुक्त भेट घेऊन पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी देण्यास विनंती करण्याचे ठरले होते.

आता जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 'पाणी टंचाईची कामे मंजूर केल्याने मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार' आहे, हे सुद्धा आता होणार नाही. त्यामुळे किमान आतातरी प्रशासनाने पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी तहानलेल्या ग्रामस्थांतुन होत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीटंचाईsindhudurgसिंधुदुर्ग