शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:53 IST

बांदा यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देबळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबगकाही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी

बांदा : यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.काही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने केली जाणारी पारंपरिक नांगरणी कमी होताना दिसत आहे. जोत तसेच मजूर मिळत नसल्याने सध्या बहुतांश ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जाते. मात्र, तरीही काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नांगरणी केली जाते.पाऊस पडल्याने डेगवे, तांबुळी, असनिये, मोरगांव परिसरात आंबा, काजू, नारळ, सुपारी कलम लागवड तसेच मशागत करण्यास सुरुवात झाली आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य पिकविले जाते. समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास यावर्षी भातशेतीला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सध्या भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी त्या कामात गुंतला आहे.पावसाची काहीशी उघडीपगेल्या आठवड्यात बांदा परिसरात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. भात लावणी करताना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागत आहे.बदलत्या काळाबरोबर शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरली आहे. बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या नांगरणीची जागा आता यांत्रिकीकरणाने घेतली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग