शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:53 IST

बांदा यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देबळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबगकाही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी

बांदा : यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.काही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने केली जाणारी पारंपरिक नांगरणी कमी होताना दिसत आहे. जोत तसेच मजूर मिळत नसल्याने सध्या बहुतांश ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जाते. मात्र, तरीही काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नांगरणी केली जाते.पाऊस पडल्याने डेगवे, तांबुळी, असनिये, मोरगांव परिसरात आंबा, काजू, नारळ, सुपारी कलम लागवड तसेच मशागत करण्यास सुरुवात झाली आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य पिकविले जाते. समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास यावर्षी भातशेतीला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सध्या भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी त्या कामात गुंतला आहे.पावसाची काहीशी उघडीपगेल्या आठवड्यात बांदा परिसरात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. भात लावणी करताना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागत आहे.बदलत्या काळाबरोबर शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरली आहे. बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या नांगरणीची जागा आता यांत्रिकीकरणाने घेतली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग